शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
3
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
4
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
5
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
6
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
7
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
8
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
9
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
10
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
11
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
12
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
13
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
14
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
15
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
16
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
17
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
18
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
19
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
20
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 19:10 IST

१ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

- दीपक ढोले 

जालना : अपघात टाळण्यासाठी जालना पोलिसांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापुढे हेल्मेट वापरणे तर बंधनकारक राहिलच शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघण करणेही वाहनधारकांना अंगलट येणार आहे. औरंगाबादनंतर जालन्यात ही मोहिम राबविण्यात येत आहे.

मद्यपान करून वाहने चालविणे, भरधाव वेग आदी कारणांमुळे अपघात वाढले आहेत. मागील तीन वर्षांत विविध अपघातांत ३२९ लोकांचा बळीही गेला आहे. या परिस्थितीस रस्ते जरी कारणीभूत असले तरी काही प्रमाणात वाहनधारकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. दुचाकी चालविताना हेल्मेट असणे बंधनकारक आहे. हेल्मेट नसेल वाहतूक नियमांचे उल्लंघण केले म्हणून पोलीस कारवाई करतात. यामध्ये न्यायालयात खटला किंवा दंड भरावा लागतो. पोलिसांकडून आतापर्यंत हेल्मेट नसणाऱ्या वाहनधारकांवर कारवाया केल्या जात नव्हत्या. परंतु नव्यानेच आलेले पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी नवीन मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाया करण्याच्या सुचना त्यांनी वाहतूक शाखेला दिल्या आहेत. तसेच १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करा, ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांच्यावर कारवाया करण्याचा आदेशही चैतन्य यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भूज काकडे यांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. हेल्मेटसाठी मात्र वाहनधारकांना आणि आठवड्याचा कालावधी दिला आहे. 

मार लागून मृत्यूदुचाकी घसरून पडणे, समोरासमोर वाहनांची धडक होऊन खाली पडल्याने दुचाकीस्वारास डोक्याला मार लागतो. यामुळे रक्तस्त्राव होऊन वाहनधारकांचा जागीच मृत्यू होतो. डोक्याला मार लागल्यानेच सार्वाधिक मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते.

जनजागृती आवश्यकऔरंगाबादनंतर जालनामध्ये हेल्मेट सक्ती होत आहे. ही बाब सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली आहे. परंतु याबाबत वाहनधारक जास्त जागरूक नाहीत. त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना वाहतूक नियमांच पालण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून आवाहन करण्याची गरज आहे. शिवाय याबाबत सार्वजनिक ठिकाण, शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून जनजागृती करणे आवश्यक आहे.

कारवाईत दुजाभाव नकोअनेकवेळा कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून ओळखीच्यांना दंड न आकारता सोडून दिले जाते. सर्वसामान्यांना मात्र भिती दाखवून दंड वसूल केला जातो. त्यामुळे पोलिसांबद्दल संताप व्यक्त करण्यात येतो. हेल्मेट सक्ती १०० टक्के यशस्वी करायची असेल तर नागरिकांना समजून सांगण्याबरोबरच सर्वांवर समान कारवाई करणे गरजेचे आहे. यामध्ये दुजाभाव करू नये.

जनजागृती केली जात आहे१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मार्गदर्शन करण्याबरोबरच जनजागृती केली जात आहे. वाहनधारकांनीही अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा. तसेच इतर वाहतूक नियमांचेही पालन करावे. सध्या विना परवाना, फॅन्सी नंबर प्लेट, अल्पवयीन वाहनचालक यांच्यावर वाहतूक शाखा कारवाया करीत आहे. यामध्ये सातत्य ठेवले जाईल.- एस.चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :JalanaजालनाJalna Policeजालना पोलीसtwo wheelerटू व्हीलरAccidentअपघात