शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जालन्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 19:10 IST

१ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

- दीपक ढोले 

जालना : अपघात टाळण्यासाठी जालना पोलिसांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापुढे हेल्मेट वापरणे तर बंधनकारक राहिलच शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघण करणेही वाहनधारकांना अंगलट येणार आहे. औरंगाबादनंतर जालन्यात ही मोहिम राबविण्यात येत आहे.

मद्यपान करून वाहने चालविणे, भरधाव वेग आदी कारणांमुळे अपघात वाढले आहेत. मागील तीन वर्षांत विविध अपघातांत ३२९ लोकांचा बळीही गेला आहे. या परिस्थितीस रस्ते जरी कारणीभूत असले तरी काही प्रमाणात वाहनधारकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. दुचाकी चालविताना हेल्मेट असणे बंधनकारक आहे. हेल्मेट नसेल वाहतूक नियमांचे उल्लंघण केले म्हणून पोलीस कारवाई करतात. यामध्ये न्यायालयात खटला किंवा दंड भरावा लागतो. पोलिसांकडून आतापर्यंत हेल्मेट नसणाऱ्या वाहनधारकांवर कारवाया केल्या जात नव्हत्या. परंतु नव्यानेच आलेले पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी नवीन मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाया करण्याच्या सुचना त्यांनी वाहतूक शाखेला दिल्या आहेत. तसेच १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करा, ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांच्यावर कारवाया करण्याचा आदेशही चैतन्य यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भूज काकडे यांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. हेल्मेटसाठी मात्र वाहनधारकांना आणि आठवड्याचा कालावधी दिला आहे. 

मार लागून मृत्यूदुचाकी घसरून पडणे, समोरासमोर वाहनांची धडक होऊन खाली पडल्याने दुचाकीस्वारास डोक्याला मार लागतो. यामुळे रक्तस्त्राव होऊन वाहनधारकांचा जागीच मृत्यू होतो. डोक्याला मार लागल्यानेच सार्वाधिक मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते.

जनजागृती आवश्यकऔरंगाबादनंतर जालनामध्ये हेल्मेट सक्ती होत आहे. ही बाब सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली आहे. परंतु याबाबत वाहनधारक जास्त जागरूक नाहीत. त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना वाहतूक नियमांच पालण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून आवाहन करण्याची गरज आहे. शिवाय याबाबत सार्वजनिक ठिकाण, शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून जनजागृती करणे आवश्यक आहे.

कारवाईत दुजाभाव नकोअनेकवेळा कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून ओळखीच्यांना दंड न आकारता सोडून दिले जाते. सर्वसामान्यांना मात्र भिती दाखवून दंड वसूल केला जातो. त्यामुळे पोलिसांबद्दल संताप व्यक्त करण्यात येतो. हेल्मेट सक्ती १०० टक्के यशस्वी करायची असेल तर नागरिकांना समजून सांगण्याबरोबरच सर्वांवर समान कारवाई करणे गरजेचे आहे. यामध्ये दुजाभाव करू नये.

जनजागृती केली जात आहे१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मार्गदर्शन करण्याबरोबरच जनजागृती केली जात आहे. वाहनधारकांनीही अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा. तसेच इतर वाहतूक नियमांचेही पालन करावे. सध्या विना परवाना, फॅन्सी नंबर प्लेट, अल्पवयीन वाहनचालक यांच्यावर वाहतूक शाखा कारवाया करीत आहे. यामध्ये सातत्य ठेवले जाईल.- एस.चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :JalanaजालनाJalna Policeजालना पोलीसtwo wheelerटू व्हीलरAccidentअपघात