शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

काँग्रेसचे ‘गेट टूगेदर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:49 IST

आपापसातील मतभेद आणि दुरावलेली मने पुन्हा जुळविण्यासाठी काँग्रेसने ‘गेट टूगेदर’ द्वारे पक्षात नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा, राज्य आणि देशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. आपापसातील मतभेद आणि दुरावलेली मने पुन्हा जुळविण्यासाठी काँग्रेसने ‘गेट टूगेदर’ द्वारे पक्षात नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाला अधिक सक्षम करुन आगामी काळात याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिका-यांनी केला आहे.मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजप, शिवसेनेची सरशी झाली आणि राज्यासह देशात सत्ता स्थापन करण्यात आली. या सत्तेत जिल्ह्याला महत्त्वाचा वाटा देण्यात आलेला आहे. एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद अशी शासकीय आणि राजकीयदृष्ट्या वजनदार पदे जिल्ह्याला लाभली आहेत. त्यातच गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु असून, शेकडो कोटी रुपये खर्चांची कामे केली जात आहेत. तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी, अशी अवस्था झाली आहे. आपल्याला डावलले जात असल्याची ज्येष्ठ पदाधिका-यांची भावना होत आहे. तर तरुणांना संधी दिली जात नसल्याने त्यांच्यात मरगळ आली आहे. एके काळी जिल्ह्यात सर्वात प्रबळ पक्ष असलेल्या काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. विविध विषयांवर आंदोलन छेडून सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष मागे असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी पुढाकार घेत हुरडा पार्टीच्या निमित्ताने घेतलेल्या ‘गेट टूगेदर’ कार्यक्रमात ज्येष्ठ आणि तरुण पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांना एकत्र आणले. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उभारणीत आणि जनमाणसात पक्षाचे स्थान निर्माण करण्यात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ नेते फुलचंद भक्कड, माजी मंत्री शंकरराव राख, रामप्रसाद कुलवंत, माजी आ. संतोषराव दसपुते, बाबूराव कुलकर्णी, ज्ञानेश्वर भांदरगे, नवाब डांगे, आर.आर. खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी ज्यांनी काँग्रेस उभारणी आपले मोलाचे योगदान दिले आहे. अशी सर्वांनी या गेट टूगेदर कार्यक्रमास उपस्थिती लावली आणि आपली मने मोकळी केली. तसेच चर्चा करुन पुढील पक्ष कार्याची दिशा बोलून दाखविली. तर जिल्ह्यात महिला आघाडीसह अल्पसंख्याक व इतर विविध सेलच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या, युवक काँग्रेसच्या शाखा , वॉर्ड कमिट्या स्थापन करून पक्ष अधिक सक्षम केला जाणार आहे. यादृष्टिने आगामी दिवसांत दर महिन्याला जिल्हा कमिटीची प्रत्येकी एका तालुक्यात बैठक घेतली जाईल. यात जुन्या जाणत्या नेत्यांना विश्वासात घेऊन नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.