शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. ...

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. जोरदार पावसामुळे जवळपास सर्वच धरणे, तलाव व विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांनी जोमाने रबी हंगामाच्या पिकांची लागवड केली आहे. सध्या पिके चांगलीच बहरलेली आहे. बहुतांश शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. परंतु, भारनियमनाने शेतकरी हैराण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना जागी राहून पाणी द्यावे लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्याची दहशत आहे. बिबट्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर तसेच वन्यप्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. रात्रीचा वीजपुरवठा असल्यावर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.

अगोदरच खरिपातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने रबीच्या पिकातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. परंतु, महावितरणच्या भारनियमनाने शेतकरी हैराण झाले आहेत. महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येत असल्याने पिकांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

रामेश्वर राऊत, शेतकरी, सौंदलगाव

वीजपुरवठ्याचे नियोजन हे राज्यस्तरावरील आहे. संबंधित यंत्रणेच्या सूचनांचे पालन करूनच हे नियोजन केले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांना वीजपुरवठा केला जातो.

एस.एस. हरकल, सहायक अभियंता