शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:18 AM

अंबड तालुक्यातील महाकाळा, चुर्मापुरी परिसरात पाण्याच्या कमततेमुळे फळबागा वाळून गेल्या आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील महाकाळा, चुर्मापुरी परिसरात पाण्याच्या कमततेमुळे फळबागा वाळून गेल्या आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर वाळू लागल्याने शेतकरी चिंतेतआहेत.कमी पर्जन्यमानामुळे परिसरा शेतकऱ्यांच्या विहीरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला यामुळे फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची मोठी कसरत करावी लागली. दोन अडीचमहिने कसेतरी बागांना पाणी दिले. मात्र, सध्या मे महिन्यात पाणी संपल्याने शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली होती. सध्या मे महिना सुरू असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीपातळी खालावल्याने सिंचनाचा बोजवारा उडाला आहे.वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे फळबागा कोमेजत आहे.अशा परिस्थितीत कृषी विभाग मात्र निद्रास्त असल्याचे निदर्शनास येते आहे. परिसरात फळबागांचे जिवापाड जतन करून भविष्याची स्वप्ने पाहणा-या शेतक-यांना या स्थितीत कृषी विभागाकडून उपाययोजनांचा सल्लाही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कृषी विभाग पांढरा हत्ती आहे काय,असा सवाल शेतक-यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने आधीच खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. वेळेपूर्वीच खरीप हंगामातील कपाशी तसेच इतर पिके काढण्याची वेळ यावर्षी आली. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतक-यांनी रब्बी पीक घेण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याची पातळी खालावली असल्याने तसेच भारनियमनच्या अडचणीमुळे शेतकºयांना रब्बी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले. तरीही शेतक-यांनी न खचता शेतातील कामे सुरू ठेवली.अखेर शेतक-याकडे लिंबू, मोसंबी, संत्रा,पपई, केळी आदींच्या फळबागा पाण्याअभावी नष्ट होत आहेत.उन्हाची तीव्रता वाढत असल्याने फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरू झाली आहे. शेतक-यांना फळबागांना पाणी देतांना अनेक अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी आहे त्या फळबागांच्या झाडांच्या मुळाशी पालापाचोळा टाकून पाण्याची धूप थांबवत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीfruitsफळेdroughtदुष्काळFarmerशेतकरी