शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर उमेदवारांचा आरामासह आढाव्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:52 IST

गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला. मतदाना नंतरचा दुसरा दिवस अर्थात मंगळवारी जवळपास सर्व नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरामाला प्राधान्य दिले. एरवी सकाळी सातच्या आत बाहेर पडणाऱ्या नेत्यांच्या गाड्या तसेच त्यांच्या बंगल्यासमोर जमणारी गर्दी आज दिसून आली नाही. अनेक नेत्यांचा दिवस हा दुपारी एक वाजेनंतरच सुरू झाला. दिवसभर अत्यंत आरामदायी पध्दतीने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. यासाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासूनच नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू होती.
मंगळवारी जालन्यातील शिवसेनचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आराम करण्याचा सल्ला देऊन स्वत: देखील १२ वाजेनंतर बाहेर पडणे पसंद केले. दुपारनंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्र तसेच नातेवाईकांकडे जाऊन एकूण परिस्थितीवर चर्चा केली. आलेल्या कार्यर्त्यांकडून कुठे कसे मतदान झाले याचा आढावा घेतला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी हाच कित्ता गिरवला.
घनसावंगी मतदारसंघातील उमेदवार राजेश टोपे यांनीही सकाळी पाथरवाला येथील निवासस्थानी थांबून घरी आलेल्या पदाधिकारी, कार्यत्यााच्या भेटी घेतल्या. तसेच सायंकाळी मुंबईला आईला भेटण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूकीच्या धामधूमित आई आजारी असतांनाही भेटीला जाता आले नसल्याची खंत आ. राजेश टोपे यांनी बोलून दाखवली.
भोकरदन विधानसभेचे भाजपचे उमेदवार संतोष दानवे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी दुपारनंतर घरी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला. त्यांचाही दिवस उशिराच सुरू झाला. बदनापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे यांनी देखील बदनापूर तसेच अंबडसह अनेक गावात भेटी दिल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बबलू चौधरी यांनी जालन्यातून सकाळी उशिरा बदनापूरला जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. परतूर मतदार संघात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुपारनंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आढावा घेतला. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेशकुमार जेथलिया हे दिवसभर परतूरमध्येच होते. त्यांनीही कार्यर्त्यांच्या भेटी घेतल्या.
मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे, आता गुरूवारीच काय ते चित्र स्पष्ट होणार असले तरी अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत टोपे विरूध्द सर्व असे समीकरण या मतदारसंघात दिसून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिकमत उढाण हे मंगळवारी घनसावंगीतच होते.
नेहमीपेक्षा त्यांचा दिवस थोडा उशिराने सुरू झाला होता. त्यांनी आंतरवाली टेंभी, उकडगाव, रांजणी तसेच जालन्यातील जिल्हा सरकारी रूग्णालयास भेट दिली. या रूग्णालयात एका जखमी कार्यकर्त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण