शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी करावी लागतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:32 AM

जालना : मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत ...

जालना : मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. रिक्षाचालकांना संसाराचा गाडा चालविताना मोेठी कसरत करावी लागत असून, बहुतांश रिक्षाचालक पर्यायी नोकरीचा शोध घेत आहे.

जालना जिल्ह्यात ७२५२ ऑटोरिक्षा आहेत. दिवसभर रिक्षा चालवून त्यातून आलेल्या पैशांतून रिक्षाचालक आपल्या संसाराचा गाडा चालवित असतात. ऐवढ्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दिवसभर रिक्षा चालवून मिळालेले निम्मे पैसे हे पेट्रोलमध्येच जात असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे बहुतांश रिक्षाचालक मिळालेल्या वेळेत पर्यायी काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा रिक्षाचालकांना बसला असून, त्यांना रिक्षा चालविणेही अवघड झाले आहे. शासनाने तत्काळ पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी होत आहे.

दिवसभरामध्ये अगोदर १०० ते १५० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागत असे. आता २०० ते ३०० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागते. दोन ते तीन लिटर पेट्रोल आता सध्या लागते. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेती नसल्यामुळे यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दर दिवसाला एक लिटरमागे पूर्वी २०० रुपये मिळायचे. आता १५० रुपये मिळतात. शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे.

राजेंद्र संसारे, रिक्षाचालक, अंबड

भोकरदनसारख्या शहरात दिवसभराचा व्यवसाय ३०० रुपये होतो. त्यामध्ये दीड ते दोन लिटर पेट्रोल लागते. त्यामुळे दिवसाकाठी कसेबसे १५० ते २०० रुपये उरतात. कुटुंबातील पाच जणांचा उदरनिर्वाह यावर भागत नाही. त्यामुळे फावल्या वेळेत दुकानात हमाली करून मिळालेल्या पैशातून संसार चालवावा लागत आहे. शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे.

शेख अन्वर, रिक्षाचालक, भोकरदन

माझे चार जणांचे कुटुंब आहे. सर्वांचा उदरनिर्वाह हा रिक्षावर अवलंबून आहे. मात्र पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे संसाराचा गाडा चालविताना दमछाक होत आहे. २०० रुपये पेट्रोलमध्ये जातात. १५० ते २०० आम्हाला उरतात. त्यामध्ये घर भाडे, किराणा खर्च व मुलांचा दवाखाना करावा लागतो. त्यामुळे काहीच शिल्लक राहत नाही. त्यामध्ये संसार कसा चालवावा? असा प्रश्न निर्माण होत आहे. रिक्षाचालकांना पेन्शन सुरू करावे.

अजिमखान लतिफखान, रिक्षाचालक, भोकरदन