शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

दुष्काळाचा पंचनामा; जिल्ह्यात ना चारा.. ना पाणी...ना छावणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:59 IST

एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाने पुन्हा एकदा दगा दिला आहे. याचे परिणाम एकूणच शेती आणि ग्रामीण भागावर भीषणतेने जाणवत आहेत. एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होते ते, शिवसेनेकडून गेल्या तीन दिवसांमध्ये थेट २२ गावांमध्ये जाऊन आॅन दी स्पॉट रिपोर्ट घेण्यात आला. यावेळी कुठलेच राजकारण न करता केवळ दुष्काळावरच शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर दुष्काळाची दाहकता मन हेलावून टाकणारी आहे.जालना जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसला. यातूनच शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण जीवन पूर्णपणे कोलमडले आहे. जालना तसेच लगतच्या बदनापूर तालुक्याचा दौरा गेल्या तीन दिवसांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिली. ते म्हणाले की, आज ज्या गावात आम्ही थेट गेलो तेथे आमचे स्वागत हे नेहमीप्रमाणे आनंदाने केले नाही, पटकन कोणी पाणी आणि चहा घ्या, असेही म्हटले नाही. परंतु आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना नाराज न करण्याची परंपरा आहे, त्यामुळे जड मनाने ‘या बसा, कोणी कडे दौरा केला? अद्याप निवडणुका लांब आहेत, तुम्ही प्रचार आतापासून सुरू केला का? कोण आहे आपला उमेदवार?’ असे एक ना अनेक प्रश्न विचारण्यात येते होते.मात्र आम्ही प्रचारासाठी नव्हे तर वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्यावर बसण्यास सतरंजी अथवा घोंगडी आणण्याची लगबग सुरू होत असते. एकूणच आज गावातील गुरांचा सांभाळ हा माणसांपेक्षाही महाग झाला आहे. एक चाºयाची पेंडी ही ४० रूपयांवर पोहोचली आहे. दिवसभरातून एका बैलाला किमान पाच पेंड्या लागतात तर किमान दहा ते १२ बारा लिटर पाणी लागते. हे आणायचे कुठून, असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी केला. चारा छावणीला का दावणीला या प्रश्नात अद्याप प्रशासन गुंतले आहे. जिल्ह्यात एवढी भयावह दुष्काळी स्थिती असताना एकही चारा छावणी सुरू झाली नसल्याने शेकºयांनी आश्चर्य व्यक्त केले. टँकर सुरू करण्यासाठी देखील नियमांचा बागूलबुवा केला जात आहे. एकूणच महिलांनी देखील आपल्या पाणी आणण्यासाठीच्या व्यथा मोठ्या विदारकपणे मांडल्या.जालना जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रशासन काहीच करत नाही, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ग्रामीण भागात जगणे अवघड झाले आहे. प्रशासनाकडून दुष्काळी भागात मदत करत असताना थोडेफार नियम हे लवचिक करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेलाच नियमावर बोट ठेवून चालल्यास परिस्थिती निवळणे अवघड होणार आहे. आज चा-याचे भाव गगनाला भिडले असून, आगामी काळात चाºयाचे भाव प्रतिशेकडा हे ५ हजार रुपयांवर पोहचतील, अशी भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे.दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांना सर्वकाही मदत ही सरकार आणि प्रशासनाकडून मिळेल, हे शक्य नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. अनावश्यक होणा-या खर्चाला फाटा देवून शेतक-यांना मदत करण्याची हीच खरी वेळ असल्याचे दौ-यातून दिसून आल्याची माहिती भास्कर अंबेकर यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईGovernmentसरकार