शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा पंचनामा; जिल्ह्यात ना चारा.. ना पाणी...ना छावणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:59 IST

एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाने पुन्हा एकदा दगा दिला आहे. याचे परिणाम एकूणच शेती आणि ग्रामीण भागावर भीषणतेने जाणवत आहेत. एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होते ते, शिवसेनेकडून गेल्या तीन दिवसांमध्ये थेट २२ गावांमध्ये जाऊन आॅन दी स्पॉट रिपोर्ट घेण्यात आला. यावेळी कुठलेच राजकारण न करता केवळ दुष्काळावरच शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर दुष्काळाची दाहकता मन हेलावून टाकणारी आहे.जालना जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसला. यातूनच शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण जीवन पूर्णपणे कोलमडले आहे. जालना तसेच लगतच्या बदनापूर तालुक्याचा दौरा गेल्या तीन दिवसांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिली. ते म्हणाले की, आज ज्या गावात आम्ही थेट गेलो तेथे आमचे स्वागत हे नेहमीप्रमाणे आनंदाने केले नाही, पटकन कोणी पाणी आणि चहा घ्या, असेही म्हटले नाही. परंतु आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना नाराज न करण्याची परंपरा आहे, त्यामुळे जड मनाने ‘या बसा, कोणी कडे दौरा केला? अद्याप निवडणुका लांब आहेत, तुम्ही प्रचार आतापासून सुरू केला का? कोण आहे आपला उमेदवार?’ असे एक ना अनेक प्रश्न विचारण्यात येते होते.मात्र आम्ही प्रचारासाठी नव्हे तर वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्यावर बसण्यास सतरंजी अथवा घोंगडी आणण्याची लगबग सुरू होत असते. एकूणच आज गावातील गुरांचा सांभाळ हा माणसांपेक्षाही महाग झाला आहे. एक चाºयाची पेंडी ही ४० रूपयांवर पोहोचली आहे. दिवसभरातून एका बैलाला किमान पाच पेंड्या लागतात तर किमान दहा ते १२ बारा लिटर पाणी लागते. हे आणायचे कुठून, असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी केला. चारा छावणीला का दावणीला या प्रश्नात अद्याप प्रशासन गुंतले आहे. जिल्ह्यात एवढी भयावह दुष्काळी स्थिती असताना एकही चारा छावणी सुरू झाली नसल्याने शेकºयांनी आश्चर्य व्यक्त केले. टँकर सुरू करण्यासाठी देखील नियमांचा बागूलबुवा केला जात आहे. एकूणच महिलांनी देखील आपल्या पाणी आणण्यासाठीच्या व्यथा मोठ्या विदारकपणे मांडल्या.जालना जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रशासन काहीच करत नाही, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ग्रामीण भागात जगणे अवघड झाले आहे. प्रशासनाकडून दुष्काळी भागात मदत करत असताना थोडेफार नियम हे लवचिक करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेलाच नियमावर बोट ठेवून चालल्यास परिस्थिती निवळणे अवघड होणार आहे. आज चा-याचे भाव गगनाला भिडले असून, आगामी काळात चाºयाचे भाव प्रतिशेकडा हे ५ हजार रुपयांवर पोहचतील, अशी भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे.दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांना सर्वकाही मदत ही सरकार आणि प्रशासनाकडून मिळेल, हे शक्य नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. अनावश्यक होणा-या खर्चाला फाटा देवून शेतक-यांना मदत करण्याची हीच खरी वेळ असल्याचे दौ-यातून दिसून आल्याची माहिती भास्कर अंबेकर यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईGovernmentसरकार