शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:42 IST

यंदा तर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, मका, कपाशी, तूर यांचे उत्पन्न निम्म्याने घटण्याची चिन्हे आहेत.

- संजय देशमुख, खणेपुरी, ता. जि. जालना

गेल्या अनेक वर्षांत जालना जिल्ह्यात अपवाद वगळताच पावसाने सरासरी गाठली आहे. यंदा तर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, मका, कपाशी, तूर यांचे उत्पन्न निम्म्याने घटण्याची चिन्हे आहेत.

गेल्यावर्षी कपाशीवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जालना तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदा कपाशीऐवजी सोयाबीनला पसंती दिली. पुरेसे पाणी असणाऱ्यांनी कापसाचीच लागवड केली. यंदाही जिल्ह्यातील ६०२ गावांमध्ये बोंडअळीचा हल्ला झाल्याने कपाशीचे उत्पन्न घटणार आहे. जालना तालुक्यातील वाघ्रुळ जहागीर हे सर्कल वगळता अन्य सातही सर्कलमधील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. जालना तालुक्यातील १५१ गावांध्ये खरिपाची पेरणी ही ८८ हजार १३१ हेक्टरवर झाली होती. त्याची पैसेवारी केवळ ४६ आहे.

जालना शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या खणेपुरी येथे ‘आॅन द स्पॉट’ पाहणी केली. गावाजवळूनच कुंडलिका नदी वाहते. पाऊसच नसल्याने या नदीत पाणी आलेच नाही. कोल्हापुरी बंधारा नसल्यात जमा आहे. गावातील अनेक विहिरींनी आताच तळ गाठला आहे. एकूणच या परिस्थितीमुळे खरीप हातचा गेला आहे. हंगामात शेतीच्या मशागतीपासून ते पिकांनी डोके वर काढल्यावर कीटकनाशक, रासायनिक आणि मिश्र खतांचा डोस देणे, पिकांमध्ये वाढलेले तण काढण्यासाठी निंदणी, खुरपणी यासाठी देखील मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. परेणीसाठीचे बियाणे खरेदीचा खर्च तर वेगळाच. डिझेलचे दर वाढल्याने यंदा ट्रॅक्टरने नांगरणीचा खर्चही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढला असून, एक हजार २०० रुपये एकरने नांगरणीचा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसाने पाठ फिरवल्याने यंदा पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या आक्टोबर महिन्यातच अनेक विहिरींनी तळ गाठला असून, टँकर सुरू करण्यासाठीची ओरड सुरू आहे. आता रबी हंगामही धोक्यात आला आहे. येथील अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मूग काढून तेथे रबी ज्वारी तसेच गहू लावला जातो. मात्र, यंदा खरीप हंगामातच मुबलक पाऊस न झाल्याने रबीचा विचार करणेही शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरणार आहे. 

उत्पादन ६० टक्क्यांवर येणारजालना तालुका हा पूर्वीपासून कमी पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात एकूण १५१ गावे आहेत. जवळपास ९८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. नुकतीच नजरअंदाज पाहणी केली असता तालुक्यातील वाघु्रळ जहांगीर हे सर्कल वगळता पिकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन ६० टक्क्यांवर येणार असल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसून येते. - पी.टी. सुखदेवे, जालना तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?

दमदार पाऊस न पडल्याने खरीप हातातून गेला. त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना वेळीच मदत करावी.     - सोपानराव बाबर, सरपंच

तीन एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु वेळेवर पाऊस न पडल्याने शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. काढणीचा खर्च एकरी दोन हजार रुपये येणार असल्याने त्यावर नांगर फिरविणार आहे. - गुलाबराव आटोळे 

मित्राकडून उसने पैसे घेऊन पेरणी केली.   ही उधारी कशी फेडायची, हे सूचेनासे झाले आहे. रबी हंगामही फारसा समाधानकारक नसण्याची चिन्हे आहेत. - भीमराव टापरे 

शेती हा व्यवसाय आता पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे शेती सोडून शेतकरी मोलमजुरीसाठी शहराकडे धावत आहेत.     - ज्ञानेश्वर शिंदे 

१९७२ चा दुष्काळ अनुभवला आहे. त्यावेळी अशीच भयावह स्थिती होती. त्यावेळी शेतकऱ्यांना मदत म्हणून रोजगार हमीची योजना मदतीला धावून आली होती. यंदा तर त्यापेक्षाही भयावह चित्र आहे.     - रामलाल भाकड

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी