शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

Drought In Marathwada : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:42 IST

यंदा तर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, मका, कपाशी, तूर यांचे उत्पन्न निम्म्याने घटण्याची चिन्हे आहेत.

- संजय देशमुख, खणेपुरी, ता. जि. जालना

गेल्या अनेक वर्षांत जालना जिल्ह्यात अपवाद वगळताच पावसाने सरासरी गाठली आहे. यंदा तर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, मका, कपाशी, तूर यांचे उत्पन्न निम्म्याने घटण्याची चिन्हे आहेत.

गेल्यावर्षी कपाशीवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जालना तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदा कपाशीऐवजी सोयाबीनला पसंती दिली. पुरेसे पाणी असणाऱ्यांनी कापसाचीच लागवड केली. यंदाही जिल्ह्यातील ६०२ गावांमध्ये बोंडअळीचा हल्ला झाल्याने कपाशीचे उत्पन्न घटणार आहे. जालना तालुक्यातील वाघ्रुळ जहागीर हे सर्कल वगळता अन्य सातही सर्कलमधील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. जालना तालुक्यातील १५१ गावांध्ये खरिपाची पेरणी ही ८८ हजार १३१ हेक्टरवर झाली होती. त्याची पैसेवारी केवळ ४६ आहे.

जालना शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या खणेपुरी येथे ‘आॅन द स्पॉट’ पाहणी केली. गावाजवळूनच कुंडलिका नदी वाहते. पाऊसच नसल्याने या नदीत पाणी आलेच नाही. कोल्हापुरी बंधारा नसल्यात जमा आहे. गावातील अनेक विहिरींनी आताच तळ गाठला आहे. एकूणच या परिस्थितीमुळे खरीप हातचा गेला आहे. हंगामात शेतीच्या मशागतीपासून ते पिकांनी डोके वर काढल्यावर कीटकनाशक, रासायनिक आणि मिश्र खतांचा डोस देणे, पिकांमध्ये वाढलेले तण काढण्यासाठी निंदणी, खुरपणी यासाठी देखील मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. परेणीसाठीचे बियाणे खरेदीचा खर्च तर वेगळाच. डिझेलचे दर वाढल्याने यंदा ट्रॅक्टरने नांगरणीचा खर्चही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढला असून, एक हजार २०० रुपये एकरने नांगरणीचा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसाने पाठ फिरवल्याने यंदा पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या आक्टोबर महिन्यातच अनेक विहिरींनी तळ गाठला असून, टँकर सुरू करण्यासाठीची ओरड सुरू आहे. आता रबी हंगामही धोक्यात आला आहे. येथील अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मूग काढून तेथे रबी ज्वारी तसेच गहू लावला जातो. मात्र, यंदा खरीप हंगामातच मुबलक पाऊस न झाल्याने रबीचा विचार करणेही शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरणार आहे. 

उत्पादन ६० टक्क्यांवर येणारजालना तालुका हा पूर्वीपासून कमी पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात एकूण १५१ गावे आहेत. जवळपास ९८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. नुकतीच नजरअंदाज पाहणी केली असता तालुक्यातील वाघु्रळ जहांगीर हे सर्कल वगळता पिकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन ६० टक्क्यांवर येणार असल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसून येते. - पी.टी. सुखदेवे, जालना तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?

दमदार पाऊस न पडल्याने खरीप हातातून गेला. त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना वेळीच मदत करावी.     - सोपानराव बाबर, सरपंच

तीन एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु वेळेवर पाऊस न पडल्याने शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. काढणीचा खर्च एकरी दोन हजार रुपये येणार असल्याने त्यावर नांगर फिरविणार आहे. - गुलाबराव आटोळे 

मित्राकडून उसने पैसे घेऊन पेरणी केली.   ही उधारी कशी फेडायची, हे सूचेनासे झाले आहे. रबी हंगामही फारसा समाधानकारक नसण्याची चिन्हे आहेत. - भीमराव टापरे 

शेती हा व्यवसाय आता पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे शेती सोडून शेतकरी मोलमजुरीसाठी शहराकडे धावत आहेत.     - ज्ञानेश्वर शिंदे 

१९७२ चा दुष्काळ अनुभवला आहे. त्यावेळी अशीच भयावह स्थिती होती. त्यावेळी शेतकऱ्यांना मदत म्हणून रोजगार हमीची योजना मदतीला धावून आली होती. यंदा तर त्यापेक्षाही भयावह चित्र आहे.     - रामलाल भाकड

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी