शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

Drought In Marathwada : पांढरे सोने पिकविणाऱ्या वाकुळणीत दुष्काळझळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:22 PM

दुष्काळवाडा : बदनापूर तालुक्यातील वाकुळणी हे पांढरे सोने पिकविणारे गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते.

- दिलीप सारडा, वाकुळणी, ता. बदनापूर, जि. जालना

बदनापूर तालुक्यातील वाकुळणी हे पांढरे सोने पिकविणारे गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते. यंदा चांगला पाऊस पडेल अशी हवामान खात्याने वल्गना केल्याने परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. मात्र पुरेशा पावसाअभावी कपाशीसह इतर पीकही शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने पांढरे सोने पिकविणाऱ्या वाकुळणीत दुष्काळाचा काळोख पसरला आहे.

पिकांच्या पेरणी व मशागतीकरिता शेतकऱ्यांनी विविध बँका, खाजगी सावकारांकडून चक्रवाढ व्याजाने कर्ज काढले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगामाची पिके गेली आहे. या गावची आणेवारी ४५ एवढी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घरात जेवढे पैसे होते तेवढे शेतीत लावल्यामुळे व आता शेतातून कवडीचेही उत्पन्न येणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बँकेचे आणि सावकाराचे कर्ज कसे फेडणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. रबीच्या उत्पन्नातून ही तूट भरून काढू, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र परतीच्या पावसाने दडी मारल्याने परिसरात रबीच्या पेरण्या खोळंबल्या. पुरेसा पाऊस न पडल्याने शेतात जनावरांसाठी चारा नाही. नदी-नाले कोरडेठाक पडल्याने पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. मुक्या जनावरांना खायला चारा नाही. कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून, त्याचा चारा म्हणूनदेखील उपयोग होत नाही. वाळलेले गवतसुद्धा शेतात नसल्यामुळे पुढे पशुधन कसे जगवायचे हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे. 

- ४८३.३० मि. मी. पाऊस तालुक्यात यंदा पडला आहे- ६८५- मि.मी. इतकी तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी आहे - १२२८,५६ - हेक्टर इतके एकूण भौगोलिक क्षेत्र वाकुळणी या गावाचे आहे- ११४४.९७ - हेक्टर लागवडीलायक क्षेत्र - ७३३ - हेक्टरमध्ये कापूस- २७- हेक्टरवर तूर - ९ - हेक्टर उडीद-१४५ - हेक्टर सोयाबीन- २१ - हेक्टर मूग- १८ - हेक्टर बाजरी-६ - हेक्टरवर मका 

मोसंबी, डाळिंब फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर वाकुळणी शिवारात विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच विहिरी कोरड्या पडत आहेत. या गावातील शेतकऱ्यांनी यावर मात करण्यासाठी सुमारे ६५ ते ७० शेततळे घेतले. शेततळ्याचे गाव अशी प्रतिमा तयार झाली. मात्र यावर्षी पाऊस नसल्यामुळे हे शेततळे कोरडे पडले आहेत. एकेकाळी मोसंबी उत्पादक अशी या गावाची ओळख होती. मात्र आता मोसंबी, डाळिंब अशा फळबागा नष्ट होत आहेत.

बळीराजा काय म्हणतो?

- आमची एकत्र कुटुंब पद्धती असून, मी व माझे मोठे बंधू दोघे शेती करतो. आम्ही आठ एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. बोंडं लागण्याच्या अवस्थेत असताना पाऊस झाला नाही. परिणामी कापसाची वाढ खुंटली. झाडे सुकली. त्यामुळे आमचे शंभर क्विंटल कापसाचे उत्पन्न बुडाले आहे़ - नारायण रामराव अवघड 

- सध्या पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पीक गेले आहे. तसेच जमिनीत ओल नसल्याने रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीमालाला शासनाने हमीदरापेक्षा दुपटीने भाव देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढावे.  - बाळासाहेब भानुदास वैद्य 

पुरेशा पावसाअभावी शेतात जनावरांसाठी चारा शिल्लक राहिलेला नाही. आमच्या कुटुंबाकडे किमान १५ जनावरे असून, त्यांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक शेतकरी आता मुक्या जनावरांना सांभाळू शकत नसल्यामुळे आठवडी बाजारात कवडीमोल दराने जनावरांची विक्री करीत आहेत. - प्रमोद संभाजी कोळकर 

- पाण्याअभावी माझी मोसंबी व डाळिंबाची फळबाग जळून गेली. तसेच दहा एकर कापसाची लागवड केलेली असून, पाण्याअभावी कपाशीचे पीकही वाळत आहे. त्यामुळे यावर्षी मी फळबाग, कापूस व अन्य पिकांसाठी लावलेला खर्च वाया गेल्याने आर्थिक बजेट बिघडले आहे. - नाथा बाळाजी अवघड 

- हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न समोर येणार आहे. शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. - किसनअप्पा श्रीरंग कोळकर 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा