शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

Drought In Marathwada : कपाशीला बोंड नाही, तुरीचा भरवसा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 19:57 IST

दुष्काळवाडा : थोडाबहुत उभा असलेला ऊस जनावराचा चारा होण्याच्या मार्गावर. पिण्यासाठी वर्षभर टँकरचेच पाणी. गावाजवळ छोटे धरण. त्यातही केवळ दहा टक्के साठा.

- शेषराव वायाळ, शेवगा, ता. परतूर, जि. जालना

खरीप हातचे गेले, रबीचा पत्ता नाही. सोयाबीन करपले, कपाशीला पाते, बोंड नाही. तुरीचा भरवसा नाही. थोडाबहुत उभा असलेला ऊस जनावराचा चारा होण्याच्या मार्गावर. पिण्यासाठी वर्षभर टँकरचेच पाणी. गावाजवळ छोटे धरण. त्यातही केवळ दहा टक्के साठा. परतूर तालुक्यातील शेवगा येथील ही दुष्काळस्थिती. 

परतूर शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेले हे गाव तसे सधन.  मजुरांची संख्या फारशी नाही. स्वत:ची शेती करून उदनिर्वाह करणाऱ्यांचीच संख्या अधिक़ पावसाने पाठ दाखविल्याने सारेच चित्र बदलले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने गावात प्रवेश करताच चार-पाच महिला डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन शेतात जाताना दिसल्या. शेतात पिण्यासाठी पाणीच नाही. खरेतर गावातही पिण्यायोग्य पाणी नाही. क्षार असल्याने हे पाणी पिल्याने हाडे ठिसूळ होऊन दात पिवळे पडतात. त्यामुळे वर्षभर गावची तहान टँकरवरच भागते.

गावाजळील धरणातही पिण्यायोग्य नाही. यावर्षी तर या धरणात केवळ १० टक्केच साठा आहे. गावाला वळसा घालणारी नदी कोरडीठाक आहे.या गावची यंदाची पैसेवारी २२.१७ टक्के. यावर्षी पाऊस खूपच कमी झाला. तोही सर्वत्र सारखा नाही. त्यामुळे विहिरी, बोअर, तलावांची पाणी पातळी वाढलीच नाही. खरिपाची पेरणी केली. सुरुवातीच्या पावसाने पिके जोमदार दिसू लागली. त्यामुळे खते, औषधीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. नंतर मात्र पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन करपले. कपाशीला बोंड लागले नाही. एका वेचणीत कापसाचे पीक उपटावे लागणार. चाळीस-पन्नास एकरांवर असलेला ऊस जनावरांचा चारा होणार.

तूर व इतर सर्वच पिके हातची गेली आहेत. शेतात ओलच नसल्याने रबी ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी होणे शक्य नाही. सध्या शाळू ज्वारी पेरणीचा हंगाम आहे. मात्र, या गावच्या शिवारात एकही तिफण दिसली नाही. ‘पाऊस पडो अथवा ना पडो, ज्वारी उगवो अथवा ना उगवो मात्र काळ्या आईची ओटी भरावी लागते. म्हणून केवळ जमिनीची ओटी भरण्यासाठी पेरणी करावी लागेल,’ असे शेतकरी सांगत होेते. गावशिवारात करपलेले सोयाबीन काढणीचे काम शेतकरी पती-पत्नी घरीच करीत होते. मजुरांसाठी पैसे आणणार कोठून, हा त्यांचा प्रश्न. 

परतूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावरशेवगा गावासारखीच बामणी, शेलवडा व वलखेड या गावांची पैसेवारी. या गावांतही शेतकऱ्यांची भयाण अवस्था आहे. संपूर्ण परतूर तालुक्याची पैसेवारी पन्नास टक्क्यांखाली आली असल्याने हा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

सर्वच पिकांची परिस्थिती वाईटतालुक्यातील सर्वच पिकांची वाईट परिस्थिती आहे. आमचे पीक कापणी प्रात्यक्षिक सुरू आहे. काही पिके साठ, तर काही सत्तर टक्के  हातची गेली आहेत.-विजयकुमार वाघमारे,  तालुका कृषी अधीकारी 

पाच वर्षांतील पर्जन्यमान (मि.मी.मध्ये)२०१४ - ४४६.६  २०१५ - ४९४.८२०१६ - ९०२.६२०१७ - ६३८ २०१८ - ४४५.८ 

बळीराजा म्हणतो?हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे. ७२ च्या दुष्काळात पाणी तरी होेते. शेतकऱ्यांपुढे यावर्षी अन्न, चारा, पाणी, अशी सर्वच संकटे एकत्रित उभी राहिली आहेत.  -अशोकराव धुमाळ

खरिपाची पिके हातची गेली. आता रबीची पेरणी होत नाही. केवळ जमिनीची ओटी भरण्यासाठी पेरणी करावी लागणार आहे. -प्रभाकर धुमाळ 

चार एकर शेती. मजुरांना काय देणार अन् आपण काय खाणार? पाऊस नसल्याने कोणत्याच मालाला उतारा नाही. -रामप्रसाद धुमाळ

शेतात कोणतेच पीक आले नसल्याने शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. अशी परिस्थीती मी कधीच पाहिली नाही. -परमेश्वर धुमाळ 

गावातील तरुणही हवालदिल झाले आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा मोठा प्रश्न आहे. घरातील होते ते सर्व पैसे शेतात गुंतवले. आता वर्षभर घरखर्च कसा भागवणार? -दत्ता धुमाळ

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीMarathwadaमराठवाडाRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र