शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : कपाशीला बोंड नाही, तुरीचा भरवसा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 19:57 IST

दुष्काळवाडा : थोडाबहुत उभा असलेला ऊस जनावराचा चारा होण्याच्या मार्गावर. पिण्यासाठी वर्षभर टँकरचेच पाणी. गावाजवळ छोटे धरण. त्यातही केवळ दहा टक्के साठा.

- शेषराव वायाळ, शेवगा, ता. परतूर, जि. जालना

खरीप हातचे गेले, रबीचा पत्ता नाही. सोयाबीन करपले, कपाशीला पाते, बोंड नाही. तुरीचा भरवसा नाही. थोडाबहुत उभा असलेला ऊस जनावराचा चारा होण्याच्या मार्गावर. पिण्यासाठी वर्षभर टँकरचेच पाणी. गावाजवळ छोटे धरण. त्यातही केवळ दहा टक्के साठा. परतूर तालुक्यातील शेवगा येथील ही दुष्काळस्थिती. 

परतूर शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेले हे गाव तसे सधन.  मजुरांची संख्या फारशी नाही. स्वत:ची शेती करून उदनिर्वाह करणाऱ्यांचीच संख्या अधिक़ पावसाने पाठ दाखविल्याने सारेच चित्र बदलले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने गावात प्रवेश करताच चार-पाच महिला डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन शेतात जाताना दिसल्या. शेतात पिण्यासाठी पाणीच नाही. खरेतर गावातही पिण्यायोग्य पाणी नाही. क्षार असल्याने हे पाणी पिल्याने हाडे ठिसूळ होऊन दात पिवळे पडतात. त्यामुळे वर्षभर गावची तहान टँकरवरच भागते.

गावाजळील धरणातही पिण्यायोग्य नाही. यावर्षी तर या धरणात केवळ १० टक्केच साठा आहे. गावाला वळसा घालणारी नदी कोरडीठाक आहे.या गावची यंदाची पैसेवारी २२.१७ टक्के. यावर्षी पाऊस खूपच कमी झाला. तोही सर्वत्र सारखा नाही. त्यामुळे विहिरी, बोअर, तलावांची पाणी पातळी वाढलीच नाही. खरिपाची पेरणी केली. सुरुवातीच्या पावसाने पिके जोमदार दिसू लागली. त्यामुळे खते, औषधीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. नंतर मात्र पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन करपले. कपाशीला बोंड लागले नाही. एका वेचणीत कापसाचे पीक उपटावे लागणार. चाळीस-पन्नास एकरांवर असलेला ऊस जनावरांचा चारा होणार.

तूर व इतर सर्वच पिके हातची गेली आहेत. शेतात ओलच नसल्याने रबी ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी होणे शक्य नाही. सध्या शाळू ज्वारी पेरणीचा हंगाम आहे. मात्र, या गावच्या शिवारात एकही तिफण दिसली नाही. ‘पाऊस पडो अथवा ना पडो, ज्वारी उगवो अथवा ना उगवो मात्र काळ्या आईची ओटी भरावी लागते. म्हणून केवळ जमिनीची ओटी भरण्यासाठी पेरणी करावी लागेल,’ असे शेतकरी सांगत होेते. गावशिवारात करपलेले सोयाबीन काढणीचे काम शेतकरी पती-पत्नी घरीच करीत होते. मजुरांसाठी पैसे आणणार कोठून, हा त्यांचा प्रश्न. 

परतूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावरशेवगा गावासारखीच बामणी, शेलवडा व वलखेड या गावांची पैसेवारी. या गावांतही शेतकऱ्यांची भयाण अवस्था आहे. संपूर्ण परतूर तालुक्याची पैसेवारी पन्नास टक्क्यांखाली आली असल्याने हा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

सर्वच पिकांची परिस्थिती वाईटतालुक्यातील सर्वच पिकांची वाईट परिस्थिती आहे. आमचे पीक कापणी प्रात्यक्षिक सुरू आहे. काही पिके साठ, तर काही सत्तर टक्के  हातची गेली आहेत.-विजयकुमार वाघमारे,  तालुका कृषी अधीकारी 

पाच वर्षांतील पर्जन्यमान (मि.मी.मध्ये)२०१४ - ४४६.६  २०१५ - ४९४.८२०१६ - ९०२.६२०१७ - ६३८ २०१८ - ४४५.८ 

बळीराजा म्हणतो?हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे. ७२ च्या दुष्काळात पाणी तरी होेते. शेतकऱ्यांपुढे यावर्षी अन्न, चारा, पाणी, अशी सर्वच संकटे एकत्रित उभी राहिली आहेत.  -अशोकराव धुमाळ

खरिपाची पिके हातची गेली. आता रबीची पेरणी होत नाही. केवळ जमिनीची ओटी भरण्यासाठी पेरणी करावी लागणार आहे. -प्रभाकर धुमाळ 

चार एकर शेती. मजुरांना काय देणार अन् आपण काय खाणार? पाऊस नसल्याने कोणत्याच मालाला उतारा नाही. -रामप्रसाद धुमाळ

शेतात कोणतेच पीक आले नसल्याने शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. अशी परिस्थीती मी कधीच पाहिली नाही. -परमेश्वर धुमाळ 

गावातील तरुणही हवालदिल झाले आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा मोठा प्रश्न आहे. घरातील होते ते सर्व पैसे शेतात गुंतवले. आता वर्षभर घरखर्च कसा भागवणार? -दत्ता धुमाळ

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीMarathwadaमराठवाडाRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र