शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

कोरोनामुळे शासनाच्या कर्जमाफी प्रक्रियेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:02 PM

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे. शहरी, ग्रामीण भागातील आपलं सरकार केंद्र, सीएससी केंद्रांवरील बायोमेट्रिक बंद करण्यात आहे. या योजनेंतर्गत आजवर जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५५० कर्जखात्यावर तब्बल ७१५ कोटी ४२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.महाआघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या दोन याद्यांमध्येच जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी अर्ध्याहून अधिक लाभार्थ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. आजवर बँका, सोसायट्यांकडून १ लाख ६२ हजार २६८ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पैकी १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांची नावे दोन याद्यांमध्ये आली आहेत. आधार प्रमाणिकरणानंतर १ लख १७ हजार ५५० कर्जखात्यांवर ७१५ काटी ४२ लाख रूपये जमा झाले आहेत. तर अद्यापही जवळपास ६० हजार शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.३१ मार्चपर्यंत स्थगिती आदेशही प्रक्रिया गतीने सुरू असतानाच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. जालना जिल्ह्यातही जवळपास १० संशयित आढळून आले. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील आपलं सरकार केंद्र, सीएससी केंद्र, महा आॅनलाईन केंद्रावरील बायोमेट्रिक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या केंद्रावर शासकीय कामांसाठी नागरिकांची होणारी गर्दी, बायोमेट्रिकमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरच कर्जमाफीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgovernment schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी