शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आज व्यापाऱ्यांची स्थिती, कुणीही यावे अन् ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या ...

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

मागील चार वर्षांपासून वस्तू व सेवा कर, नोटबंदी, राजकारण्यांचा बंद, ऑनलाइन मार्केटिंगचे छोट्या-मोठ्या दुकानदारांवर झालेले अतिक्रमण, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन या सर्व समस्यांमुळे देशातील सर्वच व्यापारी त्रस्त झाले आहे. या सर्व विषयावर मार्ग काढण्यासाठी व सरकारने व्यापाऱ्यांना या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्याबरोबर जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चासत्रात ललित गांधी म्हणाले की, व्यापारी वर्ग हा नेहमीच सोशिक राहिला असून अन्याय निमूटपणे सहन करत आलेला आहे. जोपर्यंत सरकार व्यापार वृद्धीसाठी लागणारे कायदे सुटसुटीत करत नाही तोपर्यंत व्यापार-उद्योग वाढीस पोषक वातावरण तयार होणार नाही असेही ते म्हणाले.

ललित गांधी यांच्या या राज्यव्यापी दौऱ्याअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता. गांधी यांच्या या दौऱ्याच्या आधारे तयार केलेला अहवाल राष्ट्रीय शिखर संस्थेबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांना सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महासंघाचे अध्यक्ष विनीतजी सहानी यांनी केले. सूत्रसंचालन महासंघाचे कार्यकारी सचिव श्याम लोया यांनी तर बंकटलाल खंडेलवाल यांनी आभार मानले.

कार्यक्रमास सुनील रायठठ्ठा, संजय दाड, राजेश राऊत, अर्जुन गेही, इदरचंद तवरावाला, विजय राठी, सुभाष देविदान, विजय बगडिया, राजेश कामड, दिलीप शहा, विनोद कुमावत, विजयचंद सुराणा, नागेश बेनीवाल, महेश भक्कड, मनीषा तवरावाला, प्रमोद गंडाळ, संजय रुईखेडकर, कांतीलाल राठी, दत्तप्रसाद लड्डा, योगेश ठक्कर, प्रमेन्द्र अग्रवाल,विजय दाड, विष्णू चेचाणी, अनिल पंच, राम भंडारी, दिनेश शाह, रवी पटेल, सुशील बेगानी, राजकुमार रुणवाल, महेश दुसाने, गिरधारी लधानी, गोवर्धन करवा, अजय देसरडा, अभय कुलकर्णी, अविनाश भोसले, संजय गणात्रा, वीरेंद्र रुणवाल, दर्शन जैन, नटवर मर्दा, ईश्वर बिल्होरे इत्यादींची उपस्थिती होती.

--------

सरकारने कुठलेही पॅकेज दिले नसल्याची खंत

जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी व कार्यकारी सचिव शाम लोया यांनी वस्तू व सेवा कर कायदा अमलात आल्यापासून आतापर्यंत ९५० वेळा कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाचे जे नुकसान झाले त्याबद्दल सरकारने कुठलाही मोठे पॅकेज व्यापाऱ्यांना दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.