शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

आज व्यापाऱ्यांची स्थिती, कुणीही यावे अन् ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या ...

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

मागील चार वर्षांपासून वस्तू व सेवा कर, नोटबंदी, राजकारण्यांचा बंद, ऑनलाइन मार्केटिंगचे छोट्या-मोठ्या दुकानदारांवर झालेले अतिक्रमण, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन या सर्व समस्यांमुळे देशातील सर्वच व्यापारी त्रस्त झाले आहे. या सर्व विषयावर मार्ग काढण्यासाठी व सरकारने व्यापाऱ्यांना या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्याबरोबर जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चासत्रात ललित गांधी म्हणाले की, व्यापारी वर्ग हा नेहमीच सोशिक राहिला असून अन्याय निमूटपणे सहन करत आलेला आहे. जोपर्यंत सरकार व्यापार वृद्धीसाठी लागणारे कायदे सुटसुटीत करत नाही तोपर्यंत व्यापार-उद्योग वाढीस पोषक वातावरण तयार होणार नाही असेही ते म्हणाले.

ललित गांधी यांच्या या राज्यव्यापी दौऱ्याअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता. गांधी यांच्या या दौऱ्याच्या आधारे तयार केलेला अहवाल राष्ट्रीय शिखर संस्थेबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांना सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महासंघाचे अध्यक्ष विनीतजी सहानी यांनी केले. सूत्रसंचालन महासंघाचे कार्यकारी सचिव श्याम लोया यांनी तर बंकटलाल खंडेलवाल यांनी आभार मानले.

कार्यक्रमास सुनील रायठठ्ठा, संजय दाड, राजेश राऊत, अर्जुन गेही, इदरचंद तवरावाला, विजय राठी, सुभाष देविदान, विजय बगडिया, राजेश कामड, दिलीप शहा, विनोद कुमावत, विजयचंद सुराणा, नागेश बेनीवाल, महेश भक्कड, मनीषा तवरावाला, प्रमोद गंडाळ, संजय रुईखेडकर, कांतीलाल राठी, दत्तप्रसाद लड्डा, योगेश ठक्कर, प्रमेन्द्र अग्रवाल,विजय दाड, विष्णू चेचाणी, अनिल पंच, राम भंडारी, दिनेश शाह, रवी पटेल, सुशील बेगानी, राजकुमार रुणवाल, महेश दुसाने, गिरधारी लधानी, गोवर्धन करवा, अजय देसरडा, अभय कुलकर्णी, अविनाश भोसले, संजय गणात्रा, वीरेंद्र रुणवाल, दर्शन जैन, नटवर मर्दा, ईश्वर बिल्होरे इत्यादींची उपस्थिती होती.

--------

सरकारने कुठलेही पॅकेज दिले नसल्याची खंत

जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी व कार्यकारी सचिव शाम लोया यांनी वस्तू व सेवा कर कायदा अमलात आल्यापासून आतापर्यंत ९५० वेळा कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाचे जे नुकसान झाले त्याबद्दल सरकारने कुठलाही मोठे पॅकेज व्यापाऱ्यांना दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.