शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
2
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
3
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
4
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
5
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
6
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
7
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
8
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
9
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
10
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
11
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
12
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख
13
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार
14
पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना
15
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या
16
Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
17
राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
18
पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!
19
...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'?
20
पाकिस्तानने भारताची ६ लढाऊ विमाने पाडली? सीडीएस अनिल चौहान यांनी सगळंच सांगितलं

आज व्यापाऱ्यांची स्थिती, कुणीही यावे अन् ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या ...

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

मागील चार वर्षांपासून वस्तू व सेवा कर, नोटबंदी, राजकारण्यांचा बंद, ऑनलाइन मार्केटिंगचे छोट्या-मोठ्या दुकानदारांवर झालेले अतिक्रमण, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन या सर्व समस्यांमुळे देशातील सर्वच व्यापारी त्रस्त झाले आहे. या सर्व विषयावर मार्ग काढण्यासाठी व सरकारने व्यापाऱ्यांना या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्याबरोबर जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चासत्रात ललित गांधी म्हणाले की, व्यापारी वर्ग हा नेहमीच सोशिक राहिला असून अन्याय निमूटपणे सहन करत आलेला आहे. जोपर्यंत सरकार व्यापार वृद्धीसाठी लागणारे कायदे सुटसुटीत करत नाही तोपर्यंत व्यापार-उद्योग वाढीस पोषक वातावरण तयार होणार नाही असेही ते म्हणाले.

ललित गांधी यांच्या या राज्यव्यापी दौऱ्याअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता. गांधी यांच्या या दौऱ्याच्या आधारे तयार केलेला अहवाल राष्ट्रीय शिखर संस्थेबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांना सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महासंघाचे अध्यक्ष विनीतजी सहानी यांनी केले. सूत्रसंचालन महासंघाचे कार्यकारी सचिव श्याम लोया यांनी तर बंकटलाल खंडेलवाल यांनी आभार मानले.

कार्यक्रमास सुनील रायठठ्ठा, संजय दाड, राजेश राऊत, अर्जुन गेही, इदरचंद तवरावाला, विजय राठी, सुभाष देविदान, विजय बगडिया, राजेश कामड, दिलीप शहा, विनोद कुमावत, विजयचंद सुराणा, नागेश बेनीवाल, महेश भक्कड, मनीषा तवरावाला, प्रमोद गंडाळ, संजय रुईखेडकर, कांतीलाल राठी, दत्तप्रसाद लड्डा, योगेश ठक्कर, प्रमेन्द्र अग्रवाल,विजय दाड, विष्णू चेचाणी, अनिल पंच, राम भंडारी, दिनेश शाह, रवी पटेल, सुशील बेगानी, राजकुमार रुणवाल, महेश दुसाने, गिरधारी लधानी, गोवर्धन करवा, अजय देसरडा, अभय कुलकर्णी, अविनाश भोसले, संजय गणात्रा, वीरेंद्र रुणवाल, दर्शन जैन, नटवर मर्दा, ईश्वर बिल्होरे इत्यादींची उपस्थिती होती.

--------

सरकारने कुठलेही पॅकेज दिले नसल्याची खंत

जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी व कार्यकारी सचिव शाम लोया यांनी वस्तू व सेवा कर कायदा अमलात आल्यापासून आतापर्यंत ९५० वेळा कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाचे जे नुकसान झाले त्याबद्दल सरकारने कुठलाही मोठे पॅकेज व्यापाऱ्यांना दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.