शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

आज व्यापाऱ्यांची स्थिती, कुणीही यावे अन् ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या ...

जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

मागील चार वर्षांपासून वस्तू व सेवा कर, नोटबंदी, राजकारण्यांचा बंद, ऑनलाइन मार्केटिंगचे छोट्या-मोठ्या दुकानदारांवर झालेले अतिक्रमण, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन या सर्व समस्यांमुळे देशातील सर्वच व्यापारी त्रस्त झाले आहे. या सर्व विषयावर मार्ग काढण्यासाठी व सरकारने व्यापाऱ्यांना या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्याबरोबर जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चासत्रात ललित गांधी म्हणाले की, व्यापारी वर्ग हा नेहमीच सोशिक राहिला असून अन्याय निमूटपणे सहन करत आलेला आहे. जोपर्यंत सरकार व्यापार वृद्धीसाठी लागणारे कायदे सुटसुटीत करत नाही तोपर्यंत व्यापार-उद्योग वाढीस पोषक वातावरण तयार होणार नाही असेही ते म्हणाले.

ललित गांधी यांच्या या राज्यव्यापी दौऱ्याअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता. गांधी यांच्या या दौऱ्याच्या आधारे तयार केलेला अहवाल राष्ट्रीय शिखर संस्थेबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांना सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महासंघाचे अध्यक्ष विनीतजी सहानी यांनी केले. सूत्रसंचालन महासंघाचे कार्यकारी सचिव श्याम लोया यांनी तर बंकटलाल खंडेलवाल यांनी आभार मानले.

कार्यक्रमास सुनील रायठठ्ठा, संजय दाड, राजेश राऊत, अर्जुन गेही, इदरचंद तवरावाला, विजय राठी, सुभाष देविदान, विजय बगडिया, राजेश कामड, दिलीप शहा, विनोद कुमावत, विजयचंद सुराणा, नागेश बेनीवाल, महेश भक्कड, मनीषा तवरावाला, प्रमोद गंडाळ, संजय रुईखेडकर, कांतीलाल राठी, दत्तप्रसाद लड्डा, योगेश ठक्कर, प्रमेन्द्र अग्रवाल,विजय दाड, विष्णू चेचाणी, अनिल पंच, राम भंडारी, दिनेश शाह, रवी पटेल, सुशील बेगानी, राजकुमार रुणवाल, महेश दुसाने, गिरधारी लधानी, गोवर्धन करवा, अजय देसरडा, अभय कुलकर्णी, अविनाश भोसले, संजय गणात्रा, वीरेंद्र रुणवाल, दर्शन जैन, नटवर मर्दा, ईश्वर बिल्होरे इत्यादींची उपस्थिती होती.

--------

सरकारने कुठलेही पॅकेज दिले नसल्याची खंत

जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी व कार्यकारी सचिव शाम लोया यांनी वस्तू व सेवा कर कायदा अमलात आल्यापासून आतापर्यंत ९५० वेळा कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाचे जे नुकसान झाले त्याबद्दल सरकारने कुठलाही मोठे पॅकेज व्यापाऱ्यांना दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.