शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

विमा कंपनीविरोधात तक्रारींचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:03 AM

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात तक्रारी देण्यासह कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. या तक्रारी नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख २० जुलै असल्याने बुधवारी शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्याने विक्रमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात तक्रारी देण्यासह कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. या तक्रारी नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख २० जुलै असल्याने बुधवारी शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्याने विक्रमी पीकविमा भरल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत सत्कार झाला होता. त्यासाठी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांच्यासह मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाने देखील मोलाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी मात्र पीकविमा भरताना अनेक तांत्रिक चुका राहिल्याने शेतक-यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी ओरिएंटल विमा कंपनी तसेच अन्य एक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बसवून शेतक-यांच्या तक्रारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातून शेतक-यांनी गर्दी केली होती.कंपनीने तातडीने दोष दूर करून मदत द्यावीपीकविमा भरण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. अनेकवेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही विमा कंपनी तसेच बँकांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहत आहे. याकडे पुढील वर्षी विमा भरण्याच्या पध्दतीत सुधारणा करून सर्व व्यवहार हे मराठीतून केल्यास शेतक-यांना नेमके काय सुरू आहे, याची कल्पना येणार आहे. अनेकवेळा आॅनलाइन विमा भरताना सर्व्हर डाऊन होण्यामुळे देखील तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी