शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:40 AM

१३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभेची लगीनघाई आता तोंडावर आली आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. भाजपला सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक मातबर नेते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. शनिवारीच चार आमदारांनी आपली भोकरदन येथील निवासस्थानी भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केला.येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ओबीसी समाजातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, कल्याण दळे, राजेंद्र राख, शेख महेमूद, प्रा. भगवानसिंग डोबाळ, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ.संजय राख, आदींची उपस्थिती होती. यावेळी गोदावरी विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, लक्ष्मण वडले यांची उद्योग महामंडळाच्या सदस्यपदी तर ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अविनाश ठाकरे, डॉ. भागवत कºहाड यांची मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल तर प्रवीण घुगे यांची बालक हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी आ. नारायण मुंडे हे होते. दानवे म्हणाले, आमचे आणि शिवसेनेचे ठरलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी कुठलेही विचार मनात आणू नयेत. लोकसभा निवडणुकीत माझ्यात आणि अर्जुन खोतकरांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. परंतु त्यात तथ्य नव्हते, ती एक नाटकीय घडामोड होती. त्या अंकावर आता पडदा पडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असून, शनिवारी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भेट घेतल्याचेही दानवेंनी सांगितले. दानवेंनी निवडणूक आचारसंहिता कधी लागेल हे निवडणूक आयोगाच्या आधीच सांगितल्याने निवडणूक कार्यक्रम फुटला की काय, अशी चर्चा होती. सूत्रसंचालन गजानन गिते यांनी केले.जातनिहाय जनगणना करणारदेशासह महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना गेल्यावेळीच जातनिहाय जनगणना होणे अपेक्षित होते, परंतु त्यावेळी सरकार आमचे नव्हते. आता सरकार आमचे असून, २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत आम्ही जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाश्वासन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेOBCअन्य मागासवर्गीय जाती