शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:41 IST

१३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभेची लगीनघाई आता तोंडावर आली आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. भाजपला सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक मातबर नेते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. शनिवारीच चार आमदारांनी आपली भोकरदन येथील निवासस्थानी भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केला.येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ओबीसी समाजातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, कल्याण दळे, राजेंद्र राख, शेख महेमूद, प्रा. भगवानसिंग डोबाळ, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ.संजय राख, आदींची उपस्थिती होती. यावेळी गोदावरी विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, लक्ष्मण वडले यांची उद्योग महामंडळाच्या सदस्यपदी तर ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अविनाश ठाकरे, डॉ. भागवत कºहाड यांची मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल तर प्रवीण घुगे यांची बालक हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी आ. नारायण मुंडे हे होते. दानवे म्हणाले, आमचे आणि शिवसेनेचे ठरलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी कुठलेही विचार मनात आणू नयेत. लोकसभा निवडणुकीत माझ्यात आणि अर्जुन खोतकरांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. परंतु त्यात तथ्य नव्हते, ती एक नाटकीय घडामोड होती. त्या अंकावर आता पडदा पडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असून, शनिवारी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भेट घेतल्याचेही दानवेंनी सांगितले. दानवेंनी निवडणूक आचारसंहिता कधी लागेल हे निवडणूक आयोगाच्या आधीच सांगितल्याने निवडणूक कार्यक्रम फुटला की काय, अशी चर्चा होती. सूत्रसंचालन गजानन गिते यांनी केले.जातनिहाय जनगणना करणारदेशासह महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना गेल्यावेळीच जातनिहाय जनगणना होणे अपेक्षित होते, परंतु त्यावेळी सरकार आमचे नव्हते. आता सरकार आमचे असून, २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत आम्ही जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाश्वासन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेOBCअन्य मागासवर्गीय जाती