शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:41 IST

१३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभेची लगीनघाई आता तोंडावर आली आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. भाजपला सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक मातबर नेते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. शनिवारीच चार आमदारांनी आपली भोकरदन येथील निवासस्थानी भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केला.येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ओबीसी समाजातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, कल्याण दळे, राजेंद्र राख, शेख महेमूद, प्रा. भगवानसिंग डोबाळ, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ.संजय राख, आदींची उपस्थिती होती. यावेळी गोदावरी विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, लक्ष्मण वडले यांची उद्योग महामंडळाच्या सदस्यपदी तर ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अविनाश ठाकरे, डॉ. भागवत कºहाड यांची मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल तर प्रवीण घुगे यांची बालक हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी आ. नारायण मुंडे हे होते. दानवे म्हणाले, आमचे आणि शिवसेनेचे ठरलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी कुठलेही विचार मनात आणू नयेत. लोकसभा निवडणुकीत माझ्यात आणि अर्जुन खोतकरांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. परंतु त्यात तथ्य नव्हते, ती एक नाटकीय घडामोड होती. त्या अंकावर आता पडदा पडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असून, शनिवारी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भेट घेतल्याचेही दानवेंनी सांगितले. दानवेंनी निवडणूक आचारसंहिता कधी लागेल हे निवडणूक आयोगाच्या आधीच सांगितल्याने निवडणूक कार्यक्रम फुटला की काय, अशी चर्चा होती. सूत्रसंचालन गजानन गिते यांनी केले.जातनिहाय जनगणना करणारदेशासह महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना गेल्यावेळीच जातनिहाय जनगणना होणे अपेक्षित होते, परंतु त्यावेळी सरकार आमचे नव्हते. आता सरकार आमचे असून, २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत आम्ही जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाश्वासन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेOBCअन्य मागासवर्गीय जाती