शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

रमाबाईनगर, अण्णा भाऊ साठेनगरातील चूल पाच दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:32 AM

जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील ...

जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील चुली पेटल्या नाहीत. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या या भागातील नागरिकांची शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भेट घेऊन संवाद साधला. तसेच गरजू नागरिकांना अन्नधान्याची उपलब्धता करून दिली.

शहरासह परिसरात गत काही दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी असल्याने त्यांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगर भागाची स्थिती गंभीर होती. ही माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शहरप्रमुख विष्णू पाचफुले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दीपक राननवरे, मिलिंद काळे, सुभाष पितांबरे यांच्यासह त्या भागात धाव घेतली. यावेळी अतिवृष्टीने निर्माण झालेल्या समस्यांच्या व्यथा अनेकांनी मांडल्या. या भागात प्रत्येक पावसाळ्यात अशीच स्थिती निर्माण होत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यावेळी अंबेकर यांनी संबंधितांशी चर्चा केली. तसेच आबाल-वृद्धांच्या अन्नाची सोय करून दिली. यावेळी या भागातील नागरिक उपस्थित होते.

चौकट

प्रशासनाकडे पाठपुरावा

शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील सद्य:स्थिती बिकट आहे. अनेकांच्या घरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी जात आहे. ही बाब आपण प्रशासनासमोर मांडणार आहोत. शिवाय त्यांचे प्रश्न सोडवून मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख शिवसेना

फोटो