शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

आडनावावरून ठेवली स्मशानभूमीची नावे; वाचा १५ स्मशाने असलेल्या गावाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 5:09 PM

आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत.

ठळक मुद्देअखेरच्या प्रवासाला तरी अडचण नाही ! कथा तब्बल १५ स्मशाने असलेले पिंपळगाव रेणुकाई गावाची  

- फकिरा देशमुख 

भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे स्मशानभूमीचा सुकाळ असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे़ तालुक्यात १५७ गावे असून आजही बहुतांश गावांत स्मशानभूमीसाठी साधे टीनपत्र्याचे शेडसुध्दा नाही. मात्र पिंपळगाव रेणुकाई या आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत. त्यापैकी आठ स्मशानभूमीसाठी बांधकाम करण्यात आले आहे. एक मुस्लिम बांधवांचे कब्रस्तान आहे. सहा ठिकाणी अद्यापही उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत

या गावात अठरापगड जातींचे वास्तव्य असून चांगला एकोपाही आहे. कधीही या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण झालेली नाही.  असे असले तरी या गावात्त जातीपेक्षा आडनावावर स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले आहे.  एकाच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी जि. प.च्या तत्कालीन सभापती वर्षा देशमुख यांनी २०१३-१४ मध्ये देशमुख समाजबांधवांसाठी स्मशानभूमीचे बांधकाम केले.  त्यानंतर चंद्रकांत दानवे यांच्या निधीतून याच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी बांधली. 

मराठा समाजाच्या पाच स्मशानभूमीमराठा समाजाच्या सास्ते, नरवाडे, आहेर, गावंडे, गाडेकर अशा पाच स्मशानभूमी वेगळ्या आहेत. वाणी, बारी, नाथजोगी समाजाच्या आडनावाप्रमाणे दोन, तर ब्राह्मण, दलित, वडार यांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत.

२०१०नंतर झाले आडनावाप्रमाणे बांधकाम२०१० पर्यंत कोठेच स्मशानभूमीचे पक्के बांधकाम केलेले नव्हते,  मात्र तत्कालीन जि. प. सभापती मनिष श्रीवास्तव यांनी मराठा समाजासाठी एका स्मशानभूमीचे बांधकाम केले. त्यानंतर जातीपेक्षाही आडनावाप्रमाणे बांधकाम करण्यात आले. या शासनाच्या जागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नात्याप्रमाणे नागरिक कोणा कुटुंबियाचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करीत होते. नंतर मात्र चित्र बदलत गेले. सध्या केवळ  वडार व न्हावी समाजासाठी स्मशानभूमी नाही. 

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालनाDeathमृत्यू