शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकेच प्रेरणादायी -अपर्णा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा वापर केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन ...

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा वापर केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, असे प्रतिपादन प्राचार्या अपर्णा पवार यांनी केले. गुरुवारी साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.

शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना शाखेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या अपर्णा पवार या होत्या. यावेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, जिल्हाप्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, कवी कैलास भाले, रामदास कुलकर्णी, पांडुरंग वाजे, संदीप इंगोले, उमाकांत बोमनाळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्राचार्या पवार म्हणाल्या, आज सर्व घटकांतील वातावरण बदलले आहे. युवतींनी आपली आयुष्याची दिशा ठरविताना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची संगत धरली पाहिजे. मुलींनी आत्मविश्वासपूर्ण परिस्थितीचे आकलन करून पुढे जावे, असा सल्लाही पवार यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी यांनी साने गुरुजी कथामालेच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात साने गुरुजी कथामालेच्या सहकार्याने देण्यात आलेल्या पुस्तकांचा संच विद्यालयास देण्यात आला. सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी व किरण शर्मा यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका शुक्ला, सतीश संचेती, देशपांडे, सानप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

फोटो

जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या अपर्णा पवार, आर. आर. जोशी, डॉ. सुहास सदावर्ते, प्रा. दिगंबर दाते आदी.