शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होणार आहे. पक्षपातळीवर ही लढत खरी असली ...

जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होणार आहे. पक्षपातळीवर ही लढत खरी असली तरी प्रत्यक्षात मात्र पॅनलच्या माध्यमातून गावातील दोन गट एकमेकांसमोर येतात. त्यामुळे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते कुठल्या पॅनलमध्ये आहेत, हे सांगणे कठीण होते.

गावपातळीवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता कोरोनाच्या काळात जाहीर झाल्या आहेत. वास्तवात या निवडणुका मुदत संपल्याने जूनमध्ये होणे अपेक्षित होते; परंतु त्या काळात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर असल्याने निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी होऊ घातलेल्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत राहून त्यावर झेंडा फडकविण्यासाठी जय्यत तयारी चालविली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापही पॅनलमधील नावे निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे उमेदवारी भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पॅनलमधील उमेदवारांची यादी निश्चित होणार नसल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु गावपातळीवर फार कमी ठिकाणी बिनविरोध निवडणुका होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अ.भा. काँग्रेस समितीचे भीमराव डोंगरे, कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांचा कस लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांचा कस लागणार आहे. परतूर तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर विरुद्ध माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया अशीच, लढत होईल. जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा येथे सरळ लढती होणार आहेत. प्रामुख्याने भोकरदन तालुक्यात माजी आमदार चंद्रकांत दानवे विरुद्ध आमदार संतोष दानवे यांचा कस लागणार आहे. या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच कोणता पक्ष वरचढ ठरला हे कळेल.

या तालुक्यात लक्षवेधी

जालना- अर्जुन खोतकर विरुद्ध भास्कर दानवे

परतूर- बबनराव लोणीकर विरुद्ध सुरेश जेथलिया

घनसवंगी- राजेश टोपे विरुद्ध शिवाजी बोबडे

भोकरदन- संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे

सर्वच तालुक्यांत रंगत

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत निवडणुका रंगतदार होणार आहेत. जाफराबाद वगळता अन्यत्र ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.