शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

अवल कल्चर इज ॲग्रिकल्चर : मारोती तेगमपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

विदर्भातील अचलपूर येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचालित स्वर्गीय छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय, जिल्हा अमरावती आणि ...

विदर्भातील अचलपूर येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचालित स्वर्गीय छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय, जिल्हा अमरावती आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रा. भास्करराव ढाले स्मृती ऑनलाइन व्याख्यान शनिवरी पार पडले. या व्याख्यानाचा विषय हा भारतीय शेतीची अवस्था हा होता. प्रास्ताविक व स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी केले, तर प्रा. भास्कर ढाले स्मृती व्याख्यानाचे प्रयोजन व परिषदेची भूमिका डॉ. पिस्तूलकर कार्य अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांनी मांडली. डॉ. विनोद गावंडे अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांनी भारतीय शेतीची व्यवस्था व अवस्था यातील भेद विस्तृत स्वरूपात सांगितला.

यावेळी प्रमुख वक्ते तथा अंबड येथील प्रा.डॉ. मारुती तेगमपुरे विस्तृत शेती समोरील आव्हाने उपाय यावर मुद्देसूद मार्गदर्शन केले. भारतीय शेतीचे वास्तव चित्र, शेतकरी, शेतमजूर, श्रीमंत शेतकरी या संकल्पना स्पष्ट केल्या. नाबार्डचे कार्य भारतातील सबसिडीची जागतिक पातळीवर तुलना व भारतीय शेतीचे प्रश्नासंबंधी आपला दृष्टिकोन कसा असावा उद्योगधंद्यातील गुंतवणूक व शेतीतील गुंतवणूक यातील तुलना व त्यामुळे निर्माण होणारा रोजगार यांचे प्रतिपादन केले.

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळणे आवश्यक आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज रोजी देशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची (एपीएमसी) संख्या ४४७७ इतकीच असून, खऱ्या अर्थाने देशाला ४२ हजार एपीएमसी आवश्यकता आहे. आजमितीस फक्त ६ टक्केच व्यवहार एपीएमसीच्या माध्यमातून पार पडतात. उर्वरित ९४ टक्के शेतमालाचे व्यवहार एपीएमसीच्या बाहेरच होतात. आजही ८६ टक्के शेतमालाचे व्यवहार जिल्ह्यांतर्गतच होतात. अशा परिस्थितीत एपीएमसीची संख्या वाढवण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सचिव श्रीपाद तारे यांनी शेतकरी आत्महत्या याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.