शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

संतप्त नागरिकांचा हंडामोर्चा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:46 AM

पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या वाढत चालली आहे. गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक, महिलांतून रोष व्यक्त होत आहे. पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.जालना तालुक्यातील पुणेगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी जि.प. कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक टँकर मजूर केले. एक दिवस गावात टँकरही आले. परंतु, त्यानंतर गावात टँकर आलेच नाही.एका टँकरवर तहान भागविणे अवघड झाले आहे. पाणी टंचाईच्या या समस्येकडे सरपंच, ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावात दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले. यावेळी कारभारी साहेबराव अंभोरे, शांता दारकड, लता करपे, सतीश इंगळे, नारायण घुगे, धोंडीराम चुनखडे, धोंडीराम चुनखडे, सोपान उगले, राजाभाऊ चुनखडे आदींची उपस्थिती होती.पाण्यासाठी रास्ता रोकोचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री / जामखेड : अंबड तालुक्यातील बारासवाडा येथील गल्हाटी धरणात जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडविण्यात यावे, अशी मागणी वीस गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी अंबड तहसीलदारांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास ‘रास्ता रोको’ करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यंदाच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती व परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून गल्हाटी धरणात जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. याबाबत ०२ मार्च २०१९ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शहापूर येथे रास्ता रोको करण्यात आला होता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही शेतक-यांनी घेतला होता. परंतु, अंबड तहसीलदारांच्या मध्यस्तीने हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही याची दखल प्रशासनाने घेतली नाही.गल्हाटी धरणात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्हाटी धरणात प्रशासनाने तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात आली. येत्या चार दिवसात पाणी सोडले नाही तर ३१ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी संतोष जेधे, पांडुरंग गटकळ, बंडू मैद, ए. एस. जाधव, संतोष झनझने, प्रवीण पवार, अनिल राठोड, अनिल सावंत, रमेश सोनवणे, उमेश गव्हाणे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ