शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू

By विजय मुंडे  | Updated: January 31, 2023 12:02 IST

पीकअप टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी

आष्टी (जि.जालना) : आजारी असलेल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासह दोन मुलींच्या ओढीने घराकडे जाणाऱ्या ऊसतोड मजुराचा पीकअप-दुचाकीच्या अपघातातमृत्यू झाला. तर मयताच्या पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावरील ढोकमाळ तांडा पाटीजवळ घडली.

ज्ञानेश्वर बळीराम राठोड (३०) असे मयताचे नाव आहे. तर सिंधू राठोड, बाळू बबन राठोड (तिघे रा. हास्तूर तांडा ता.परतूर) अशी जखमींची नावे आहेत. हास्तूर तांडा येथील ज्ञानेश्वर बळीराम राठोड हे ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ज्ञानेश्वर राठोड, त्यांच्या पत्नी सिंधू राठोड, पुतण्या बाळू राठोड हे सोमवारी सकाळी ऊसतोडणीच्या कामासाठी कोकाटे हादगाव येथे गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री दुचाकीवरून गावाकडे परतत होते. त्यांची दुचाकी (क्र.एम.एच.१३- ए.टी. १३१९) आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावर आली असता भरधाव बोलेरो पीकअपने (एम.एच.२१- एक्स.६५६४) जोराची धडक दिली.

अपघातानंतर तिघे जखमी रस्त्यावर विव्हळत पडले होते. परंतु, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाल्याचे मधुकर राठोड यांनी सांगितले. तर सिंधू राठोड व बाळू राठोड या दोघांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पीकअप चालक पळून गेला. या प्रकरणात मंगळवारी सकाळी आष्टी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळाला पोहेका पालवे, राहुल वाघमारे यांनी भेट देवून पंचनामा केला. तपास पोउपनि लव्हारे हे करीत आहेत.

दोन मुलींसह मुलावरील वडिलांचे छत्र हरवलेज्ञानेश्वर राठोड हे भूमिहिन असून, उदरनिर्वाहासाठी ते ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली आणि एक सहा महिन्यांचा मुलगा आहे. लहान मुलाची तब्येत बरी नसल्याने तीन दिवसांपासून त्याला घरीच ठेवून पती-पत्नी ऊसतोडणीसाठी जात होते. परंतु, ज्ञानेश्वर राठोड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सहा महिन्यांच्या मुलासह दोन मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवे आहे. या घटनेने हास्तूर तांडा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची मालिका सुरूपाथरी-आष्टी- कुंंभारपिंपळगाव- अंबड या मार्गाचे काम नुकताच झाले आहे. तर जालना ते परभणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून नांदेडहून औरंगाबादला जाणारी वाहने पाथरी ते अंबड मार्गावर येत आहेत. या मार्गावर गतीरोधक नाहीत. परिणामी भरधाव वाहनांमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू