शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू

By विजय मुंडे  | Updated: January 31, 2023 12:02 IST

पीकअप टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी

आष्टी (जि.जालना) : आजारी असलेल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासह दोन मुलींच्या ओढीने घराकडे जाणाऱ्या ऊसतोड मजुराचा पीकअप-दुचाकीच्या अपघातातमृत्यू झाला. तर मयताच्या पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावरील ढोकमाळ तांडा पाटीजवळ घडली.

ज्ञानेश्वर बळीराम राठोड (३०) असे मयताचे नाव आहे. तर सिंधू राठोड, बाळू बबन राठोड (तिघे रा. हास्तूर तांडा ता.परतूर) अशी जखमींची नावे आहेत. हास्तूर तांडा येथील ज्ञानेश्वर बळीराम राठोड हे ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ज्ञानेश्वर राठोड, त्यांच्या पत्नी सिंधू राठोड, पुतण्या बाळू राठोड हे सोमवारी सकाळी ऊसतोडणीच्या कामासाठी कोकाटे हादगाव येथे गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री दुचाकीवरून गावाकडे परतत होते. त्यांची दुचाकी (क्र.एम.एच.१३- ए.टी. १३१९) आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावर आली असता भरधाव बोलेरो पीकअपने (एम.एच.२१- एक्स.६५६४) जोराची धडक दिली.

अपघातानंतर तिघे जखमी रस्त्यावर विव्हळत पडले होते. परंतु, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाल्याचे मधुकर राठोड यांनी सांगितले. तर सिंधू राठोड व बाळू राठोड या दोघांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पीकअप चालक पळून गेला. या प्रकरणात मंगळवारी सकाळी आष्टी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळाला पोहेका पालवे, राहुल वाघमारे यांनी भेट देवून पंचनामा केला. तपास पोउपनि लव्हारे हे करीत आहेत.

दोन मुलींसह मुलावरील वडिलांचे छत्र हरवलेज्ञानेश्वर राठोड हे भूमिहिन असून, उदरनिर्वाहासाठी ते ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली आणि एक सहा महिन्यांचा मुलगा आहे. लहान मुलाची तब्येत बरी नसल्याने तीन दिवसांपासून त्याला घरीच ठेवून पती-पत्नी ऊसतोडणीसाठी जात होते. परंतु, ज्ञानेश्वर राठोड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सहा महिन्यांच्या मुलासह दोन मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवे आहे. या घटनेने हास्तूर तांडा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची मालिका सुरूपाथरी-आष्टी- कुंंभारपिंपळगाव- अंबड या मार्गाचे काम नुकताच झाले आहे. तर जालना ते परभणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून नांदेडहून औरंगाबादला जाणारी वाहने पाथरी ते अंबड मार्गावर येत आहेत. या मार्गावर गतीरोधक नाहीत. परिणामी भरधाव वाहनांमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू