शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात ८५० जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

जालना : गत दोन वर्षात जिल्ह्यातील तब्बल ८५० जणांना सर्पदंश झाला आहे. त्यात गतवर्षी एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला ...

जालना : गत दोन वर्षात जिल्ह्यातील तब्बल ८५० जणांना सर्पदंश झाला आहे. त्यात गतवर्षी एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या शासकीय रूग्णालयातील आकडेवारी व्यतिरिक्त सर्पदंशाने गंभीर जखमी झालेले रूग्ण खासगी रूग्णालयातही उपचार घेतात.

जिल्ह्यात विविध प्रजातीचे साप आढळतात. शहरी, ग्रामीण भागातही साप आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी साप निघाला की त्याला ठार मारण्याकडे नागरिकांचा अधिक कल होता. परंतु, सर्पमित्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे सापाला न मारता सर्पमित्राच्या माध्यमातून त्याला पकडून जंगलात सोडण्याकडे नागरिकांनी अधिक भर दिला आहे. शेतात काम करताना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात २०१९ मध्ये ४५७ जणांना सर्पदंश झाला होता. त्यात ऑक्टोबर महिन्यात एका गंभीर रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर चालू वर्षात आजवर सर्पदंश झालेल्या ३९३ नागरिकांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. चालू वर्षात वेळेवर उपचार मिळाल्याने एकाही जखमीचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात लसीचा साठा किती उपलब्ध?

सर्पदंश झाल्यानंतर जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले जाते. जखमीला देण्यात येणाऱ्या अँटिरेबीज सिरम या इंजेक्शनचा जिल्हा रूग्णालयात मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले.

साप चावताच काय काळजी घ्यावी

सर्पदंश झालेल्या ठिकाणापासून चार ते पाच इंचावर कापडी पट्टीने आवळून बांधावे. त्यामुळे विष शरीरात पसरण्याचा धोका कमी होतो. सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. सर्पदंश झाल्यानंतर खाण्यास किंवा पिण्यास काहीही देऊ नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चक्कर येऊ शकते आणि वेदनाही खूप होतात. त्यामुळे डॉक्टरांकडे नेण्यापर्यंत जखमी व्यक्तीला शक्यतो एकटे सोडू नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.

जिल्ह्यात आढळणारे साप

जालना जिल्ह्यात विषारी, बिनविषारी असे जवळपास २४ जातीचे साप आढळतात. त्यात मन्यार, नाग, घोणस, फुरसे, पवळा हे विषारी जातीचे साप आढळतात. मांजऱ्या, धामण, तस्कर, दिवड, कवड्या हे बिनविषारी साप आढळतात. नागरिकांनी सापला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. सर्पमित्र नाग पकडून जंगलात नेऊन सोडतील, असे आवाहन सर्पमित्र शेख फरीद यांनी केले आहे.

दोन वर्षातील घटना

२०१९ -२०२०

जानेवारी ०८ १९

फेब्रुवारी ०८ २२

मार्च १७ २३

एप्रिल १४ १९

मे १४ ०५

जून ४४ ३५

जुलै ९७ ६८

ऑगस्ट ९८ ५०

सप्टेंबर ५५ ५१

ऑक्टोबर ४७ ५७

नोव्हेंबर ३१ २७

डिसेंबर २४ १७