शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

३६५ दिवसांत ४२४ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:40 AM

: गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत. यात १८८ जणांचा बळी गेला असून, ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाढलेले अपघाताचे प्रमाण पाहता वाहतूक नियम जागृती आणि नियम मोडणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडाची कारवाई केवळ जुजबी ठरते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.रस्ता अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा, पोलीस ठाण्यातील पथके कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहासह इतर कार्यक्रमांमधून वाहतूक नियमांची जागृतीही प्रशासनाकडून केली जाते. मात्र, वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून चालक वाहने चालवित असल्याने रस्ता अपघाताचे प्रमाण आजही कायम आहे. सन २०१८ मध्ये वर्षभरात ४०० अपघाताची नोंद जालना पोलिसांच्या दप्तरी झाली होती.यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर २७९ जण गंभीर जखमी झाले होते. तर ४३ जण किरकोळ जखमी झाले होते. मात्र, गत वर्षभरात २०१९ मध्ये ४२४ रस्ता अपघाताची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यात १८८ जणांचा बळी गेला आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मयतांची संख्या घटली असली तरी गंभीर जखमींची संख्या वाढून ३२९ वर गेली आहे. तर ८७ चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.रस्ता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून केवळ वाहतूक नियम जागृती आणि दंड आकारण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मात्र, रस्त्यांची दुरूस्ती, धोकादायक वळणे, धोकादायक पूल दुरूस्तीसह इतर उपाययोजनांकडे मात्र, गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे रस्ता अपघातात वाढ होत असून, चालकांनीही स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघात रोखण्यास मदत होणार आहे.गतवर्षी २०१९ मध्ये झालेल्या ४२४ अपघातापैकी १७६ अपघातांत १८८ जणांचा बळी गेला आहे. शिवाय ४० अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.२०१८ या वर्षभरात एकूण १९१ प्राणांतिक अपघात झाले होते. यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर ३५ अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा