शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शंभर गावांना मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:16 IST

एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. त्यानंतर ‘ब्लोअर’ मशीनची चाचणीही यावेळी घेण्यात आली.परतूर येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. लोणीकर म्हणाले, परतूर, मंठा तालुक्यांतील गावांसह इतर काही गावे मिळून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून १७६ गावांसाठी शुध्द पाणी देणाऱ्या ‘वॉटर ग्रीड’ योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्य जलशुध्दीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाणी शुध्दीकरणासाठी लागणा-या (ब्लोअर) हवा निर्माण करणा-या मशीनची चाचणी नुकतीच घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. या योजनेचे काम महिनाभरात पूर्ण होऊन नागरिकांना शुध्द पाणी मिळेल. काही गावांनी ठरावांना संमती न दिल्याने त्या गावाचे काम रखडले होते. तसेच परतूर व मंठा अशा दोन तालुक्यांची योजना वेगळी करण्यात आली आहे. अनेक गावांत जलकुंभाची कामे सुरू आहेत. महिनाभरात ही कामे पूर्ण होऊन शुध्द पाणी मिळेल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत आहे. मराठवाडा सातत्याने दुष्काळाला तोंड देत आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ग्रीड योजनेतून सुटेल. याच धर्तीवर शेतीसाठीही पाणी मिळाले पाहिजे, यासाठी धरणांचेही ग्रीड करून काही धरणे अंडरग्राउंड पाईप लाईनने जोडण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे.मराठवाड्यावर झाला अन्याय ...जायकवाडी धरणाच्यावर धरणे बांधून पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केला आहे. वर अनेक धरणे बांधल्याने जायकवाडी धरणात पाणी येत नाही. दुसरी बाब म्हणजे आपले पाणी तेलंगणात वाहून जाते. या पाण्याला अडवण्याचे काम विरोधी सरकारच्या काळात झाले नाही. आपल्या भागातील तेलंगणात जाणारे पाणी अडवले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. आज आपण पाणी अडवतो, जिरवतो; मात्र हे पाणी जास्त दिवस टिकत नाही.त्यामुळे कायमस्वरूपी पर्याय शोधणे गरजेचे आहे. आपली ही वॉटर ग्रीड योजना महराष्ट्र राज्यातील पहिली जंबो योजना आहे. आपण अहोरात्र काम करून, अभ्यास करून व माहिती घेऊन ही योजना पूर्णत्वास नेली आहे. निश्चितच ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास जात आहे. या योजनेतून सर्वांनाच शुध्द पाणी मिळेल, असा विश्वास शेवटी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :WaterपाणीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण