शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

शंभर गावांना मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:16 IST

एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. त्यानंतर ‘ब्लोअर’ मशीनची चाचणीही यावेळी घेण्यात आली.परतूर येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. लोणीकर म्हणाले, परतूर, मंठा तालुक्यांतील गावांसह इतर काही गावे मिळून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून १७६ गावांसाठी शुध्द पाणी देणाऱ्या ‘वॉटर ग्रीड’ योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्य जलशुध्दीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाणी शुध्दीकरणासाठी लागणा-या (ब्लोअर) हवा निर्माण करणा-या मशीनची चाचणी नुकतीच घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. या योजनेचे काम महिनाभरात पूर्ण होऊन नागरिकांना शुध्द पाणी मिळेल. काही गावांनी ठरावांना संमती न दिल्याने त्या गावाचे काम रखडले होते. तसेच परतूर व मंठा अशा दोन तालुक्यांची योजना वेगळी करण्यात आली आहे. अनेक गावांत जलकुंभाची कामे सुरू आहेत. महिनाभरात ही कामे पूर्ण होऊन शुध्द पाणी मिळेल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत आहे. मराठवाडा सातत्याने दुष्काळाला तोंड देत आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ग्रीड योजनेतून सुटेल. याच धर्तीवर शेतीसाठीही पाणी मिळाले पाहिजे, यासाठी धरणांचेही ग्रीड करून काही धरणे अंडरग्राउंड पाईप लाईनने जोडण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे.मराठवाड्यावर झाला अन्याय ...जायकवाडी धरणाच्यावर धरणे बांधून पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केला आहे. वर अनेक धरणे बांधल्याने जायकवाडी धरणात पाणी येत नाही. दुसरी बाब म्हणजे आपले पाणी तेलंगणात वाहून जाते. या पाण्याला अडवण्याचे काम विरोधी सरकारच्या काळात झाले नाही. आपल्या भागातील तेलंगणात जाणारे पाणी अडवले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. आज आपण पाणी अडवतो, जिरवतो; मात्र हे पाणी जास्त दिवस टिकत नाही.त्यामुळे कायमस्वरूपी पर्याय शोधणे गरजेचे आहे. आपली ही वॉटर ग्रीड योजना महराष्ट्र राज्यातील पहिली जंबो योजना आहे. आपण अहोरात्र काम करून, अभ्यास करून व माहिती घेऊन ही योजना पूर्णत्वास नेली आहे. निश्चितच ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास जात आहे. या योजनेतून सर्वांनाच शुध्द पाणी मिळेल, असा विश्वास शेवटी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :WaterपाणीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण