शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

शंभर गावांना मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:16 IST

एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. त्यानंतर ‘ब्लोअर’ मशीनची चाचणीही यावेळी घेण्यात आली.परतूर येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. लोणीकर म्हणाले, परतूर, मंठा तालुक्यांतील गावांसह इतर काही गावे मिळून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून १७६ गावांसाठी शुध्द पाणी देणाऱ्या ‘वॉटर ग्रीड’ योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्य जलशुध्दीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाणी शुध्दीकरणासाठी लागणा-या (ब्लोअर) हवा निर्माण करणा-या मशीनची चाचणी नुकतीच घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. या योजनेचे काम महिनाभरात पूर्ण होऊन नागरिकांना शुध्द पाणी मिळेल. काही गावांनी ठरावांना संमती न दिल्याने त्या गावाचे काम रखडले होते. तसेच परतूर व मंठा अशा दोन तालुक्यांची योजना वेगळी करण्यात आली आहे. अनेक गावांत जलकुंभाची कामे सुरू आहेत. महिनाभरात ही कामे पूर्ण होऊन शुध्द पाणी मिळेल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत आहे. मराठवाडा सातत्याने दुष्काळाला तोंड देत आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ग्रीड योजनेतून सुटेल. याच धर्तीवर शेतीसाठीही पाणी मिळाले पाहिजे, यासाठी धरणांचेही ग्रीड करून काही धरणे अंडरग्राउंड पाईप लाईनने जोडण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे.मराठवाड्यावर झाला अन्याय ...जायकवाडी धरणाच्यावर धरणे बांधून पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केला आहे. वर अनेक धरणे बांधल्याने जायकवाडी धरणात पाणी येत नाही. दुसरी बाब म्हणजे आपले पाणी तेलंगणात वाहून जाते. या पाण्याला अडवण्याचे काम विरोधी सरकारच्या काळात झाले नाही. आपल्या भागातील तेलंगणात जाणारे पाणी अडवले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. आज आपण पाणी अडवतो, जिरवतो; मात्र हे पाणी जास्त दिवस टिकत नाही.त्यामुळे कायमस्वरूपी पर्याय शोधणे गरजेचे आहे. आपली ही वॉटर ग्रीड योजना महराष्ट्र राज्यातील पहिली जंबो योजना आहे. आपण अहोरात्र काम करून, अभ्यास करून व माहिती घेऊन ही योजना पूर्णत्वास नेली आहे. निश्चितच ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास जात आहे. या योजनेतून सर्वांनाच शुध्द पाणी मिळेल, असा विश्वास शेवटी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :WaterपाणीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण