शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:27 AM

सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे

दुबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, हे मान्य केले तरी भारताने या अनावश्यक गोष्टी का कराव्यात हे अनाकलनीय आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.शेख हसीना सध्या संयुक्त अरब अमिरातींच्या दौऱ्यावर आहेत. ‘सीएए’वरून सध्या भारतात सुरू असलेल्या विरोधाच्या संदर्भात विचारता ‘गल्फ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे, असे भारत सरकारने वारंवार सांगितले आहे व गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये नवी दिल्ली भेटीत पंतप्रधान मोदी यांनी मला तसे आश्वासनही दिले आहे.तरीही या गोष्टी भारत सरकार काय करीत आहे? त्याची काही गरज नव्हती, अशी पुस्तीही शेख हसीना यांनी जोडली. बांगलादेशच्या एकूण १६.१ कोटी लोकसंख्येत १०.७ टक्के हिंदू व ०.६ टक्के बौद्ध आहेत व तेथून धार्मिक छळामुळे लोक भारतात जातात याचे बांगलादेशने खंडन केलेले आहे. शेख हसीना म्हणाल्या की, लोकांनी भारतातून बांगलादेशात उलटे स्थलांतर केल्याच्या नोंदी नाहीत. मात्र, भारतातील भारतात लोकांना त्रास सोसावा लागत आहे; पण हीसुद्धा भारताची अंतर्गत बाब आहे. औपचारिकपणे बांगलादेशाने ही भूमिका घेतली असली तरी भारतातील या दोन्ही घडामोडींवरून तेथे बरीच अस्वस्थता आहे.ही भारताची अंतर्गत बाब असली तरी त्याचा परिणाम शेजारी देशांवरही होऊ शकतो, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी बोलून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर ‘सीएए’ मंजूर झाल्यानंतर बांगलादेशच्या तीन मंत्र्यांनी भारताचे नियोजित दौरे रद्दही केलेहोते. पंतप्रधान शेख हसीना मात्र या मुलाखतीत म्हणाल्या की, सध्या भारत व बांगलादेशचे संबंध सर्वोत्तम आहेत व दोन्ही देशांमध्ये व्यापक पातळीवर सहकार्य सुरू आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक