शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून परतताच UAE च्या राष्ट्रपतींचा पाकिस्तानला दे धक्का! शहबाज शरीफ यांची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:13 IST

पाकिस्तान आणि युएईचे पूर्वीपासूनच विशेषतः विमान वाहतूक क्षेत्रात मजबूत संबंध आहेत. १९८० च्या दशकात एमिरेट्स एअरलाइन्सच्या स्थापनेत पाकिस्तानने मोठी भूमिका बजावली

इस्लामाबाद - UAE चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अचानक ३ तासांसाठी भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दौऱ्याने दक्षिण आशियातील चित्र बदललं आहे. भारतातून परतल्यानंतर शेख मोहम्मद जायद यांनी मैत्रीचा हवाला देत ९०० भारतीयांची जेलमधून सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पाकिस्तानलाही अप्रत्यक्षपणे यूएईने मोठा झटका दिला आहे.

पाकिस्तानच्या इस्लामाबाद विमानतळाचे संचालन करण्यासाठी युएईने केलेला करार आता रद्द केला आहे. पाकिस्तानी वृत्तसंस्था एक्सप्रेस ट्रिब्यूनने याची पुष्टी केली आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, युएईने या प्रक्रियेत सहभाग घेण्यास नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची झोप उडणार आहे. पाकिस्तानच्या आर्थिक अडचणीच्या काळात ऑगस्ट २०२५ मध्ये इस्लामाबाद विमानतळ ताब्यात घेण्यास युएईने सहमती दर्शविली होती. आता, युएईने केवळ या करारातून माघार घेतली नाही तर स्थानिक भागीदारही निश्चित केलेला नाही. इस्लामाबाद विमानतळ करार तुटण्यामागे कोणतेही राजकीय कारण रिपोर्टमध्ये थेट दिले नाही. परंतु हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा युएई आणि सौदी अरेबियामधील तणाव संपूर्ण दक्षिण आशियामध्ये उमटू लागले आहेत. पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला आहे आणि त्यात तुर्कीचा समावेश करून "इस्लामिक नाटो" तयार करू इच्छित आहे ज्यामुळे युएई नाराज असल्याचं बोलले जाते. 

सौदीशी जवळीक बनली पाकिस्तानची अडचण?

इतकेच नाही तर पाकिस्तानशी करार मोडल्याची बातमी भारत आणि यूएई यांच्यातील संबंध मजबूत होत असताना पुढे आली आहे. १९ जानेवारीला शेख मोहम्मद बिन जायद अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहचले होते. त्यांचा हा दौरा अवघ्या ३ तासांचा होता परंतु त्याचे भविष्यात खूप परिणाम होतील असं मानले जात होते. पाकिस्तानचे दोन्ही आखाती देशांशी दीर्घकालीन आणि आर्थिक संबंध आहेत, परंतु त्यांचा कल नेहमीच सौदी अरेबियाकडे जास्त राहिला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली, ज्यात आता तुर्कीही सहभागी झाल्याचे सांगितले जाते. 

पाकिस्ताननं गमावला विश्वास 

पाकिस्तान आणि युएईचे पूर्वीपासूनच विशेषतः विमान वाहतूक क्षेत्रात मजबूत संबंध आहेत. १९८० च्या दशकात एमिरेट्स एअरलाइन्सच्या स्थापनेत पाकिस्तानने मोठी भूमिका बजावली. सुरुवातीला पाकिस्तानने तांत्रिक सहाय्यापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व काही पुरवले. एमिरेट्सची पहिली उड्डाण दुबई ते कराची होती. मात्र कालांतराने पाकिस्तानची स्वतःची एअरलाइन आणि तिची संपूर्ण विमान वाहतूक व्यवस्था कमकुवत झाली आहे. आज वारंवार अपघात होतात, पायलट परवाने सदोष आहेत आणि तंत्रज्ञान जुने झाले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही गुंतवणूकदारासाठी प्रणाली सुधारणे कठीण आहे. युएईला कठीण ठिकाणी काम करण्याचा, अफगाणिस्तानातील अनेक विमानतळ चालवण्याचा अनुभव आहे असे असूनही पाकिस्तानमधून त्यांनी माघार घेतल्याने तो विश्वास आता पूर्वीसारखा राहिलेला नाही हे स्पष्टपणे दिसून येते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : UAE Snubs Pakistan After India Visit, Islamabad Airport Deal Collapses

Web Summary : Following a visit to India, the UAE withdrew from operating Islamabad Airport, a blow to Pakistan's struggling economy. This decision, coinciding with strengthened India-UAE ties and Pakistan's closer relations with Saudi Arabia, raises concerns about regional dynamics and lost trust in Pakistani infrastructure.
टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीPakistanपाकिस्तानIndiaभारतsaudi arabiaसौदी अरेबिया