शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 20:15 IST

भारताने अफगाण लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपले धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा आहे, असेही झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे.

इस्लामाबाद -तालिबानलाभारतासह सर्वच देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. अफगाणिस्तानची भूमी आता कुठल्याही देशाविरुद्ध वापरू दिली जाणार नाही. तालिबानभारताला या क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग मानतो, असे तालिबानचा प्रवक्ता झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तवाहिनीनेही वृत्त दिले आहे.

भारताने अफगाण लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपले धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा आहे, असेही झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे. अमेरिकन सैन्य माघारीच्या दोन आठवडे आधी, म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळविला. अफगाणिस्तानमध्ये 'तेहरीक ए तालिबान पाकिस्तान' आणि 'इस्लामिक स्टेट' पुन्हा तोड वर काढण्याच्या शक्यते संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना मुजाहिद म्हणाला, "यापूर्वीही आम्ही स्पष्ट केले आहे, की आमची भूमी इतर कुठल्याही देशाविरोधात वापरू दिली जाणार नाही. आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे. ”

काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय

वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शेजारी असल्याने आणि त्यांचे हित एकमेकांशी संबंधित असल्याने त्यांना सोबत बसून प्रलंबित समस्यांवर तोडगा काढावा लागेल. याच बरोबर अफगाणिस्तान मुक्त केल्याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरच शरिया कायद्यानुसार सरकार स्थापन होईल, असे मुजाहिदने म्हटले आहे.तालिबानने अफगाणिस्तानात राहणाऱ्या लोकांना वचन दिले आहे, की 'आपण सुरक्षित राहाल. तुमचा दरवाजा कुणीही ठोठावणार नाही. अफगाणिस्तानात कुणीही कुणाचे अपहरण करू शकणार नाही. कुणीही कुणाला मारू शकणार नाही, आम्ही नियमितपणे सुरक्षा वाढवू. आमच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचे राहणीमान उंचावेल. याशिवाय, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, ही आमची पहिली जबाबदारी आहे. यानंतर लोक शांततेत राहू शकतील, असे तालिबानने म्हटले आहे.

अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद