शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:48 IST

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडच्या दिवसांत रक्तरंजित संघर्ष दिसून येत आहे. या लढाईत पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले.

कराची - अफगाणिस्तानसोबत लढाईत शेकडो सैनिक मारल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी विनाकारण भारतावर आरोप केले आहेत. अफगाणिस्ताननेभारताच्या इशाऱ्यावर पाकिस्तानवर हल्ला केला, कारण हे हल्ले अशावेळी झाले जेव्हा अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी दिल्लीत होते असा दावा शहबाज शरीफ यांनी केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी टू फ्रंट वॉरवर भाष्य करत भारत पुन्हा युद्ध छेडू शकतो आणि पाकिस्तान त्यासाठी तयार आहे अशी पोकळ धमकी दिली आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडच्या दिवसांत रक्तरंजित संघर्ष दिसून येत आहे. या लढाईत पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर एअर स्ट्राइक केले आहे. त्यात अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. घरे तुटली, शाळा पडल्या. काबुल, पक्तिका, खोस्त, नांगरहर, कंधार आणि इतर प्रांतात पाकिस्तानकडून २० हून अधिक ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आले. या हल्ल्यात १२ तालिबानी नागरिक मृत्युमुखी पडले तर १०० हून अधिक जखमी झालेत. १५-२० तालिबानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सध्या दोन्ही देशात सीजफायर असले तरी तणाव कायम आहे. त्यातच शहबाज शरीफ यांनी आव्हानात्मक भाषा वापरत जर हा सीजफायर केवळ वेळ काढण्यासाठी घेतला असेल तर आम्हाला तो स्वीकार नाही असं सांगितले आहे. त्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत शहबाज यांनी भारताला ओढण्याचा प्रयत्न केला. भारताच्या इशाऱ्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारतात असताना हे हल्ले करण्यात आल्याचे शहबाज शरीफ यांनी म्हटलं. दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनी अफगाणिस्तान आणि भारत या दोघांशी एकाच वेळी युद्ध करण्याची पाकिस्तानची तयारी असल्याचा पोकळ दावा केला आहे.

एका मुलाखतीत पाकिस्तानी संरक्षण मंत्र्‍याला भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो का, तुम्हाला यावर काय वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नक्कीच, हे नाकारू शकत नाही. याची शक्यता अधिक आहे. सध्या परिस्थिती तणावग्रस्त आहे. जर दोन्ही मोर्चावर युद्ध छेडले तर आम्हीही तयार आहोत. मी सार्वजनिकपणे यावर चर्चा करू शकत नाही मात्र आम्ही कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Blames India for Taliban Attack, Threatens War Readiness.

Web Summary : Pakistani PM accuses India of instigating Taliban attacks during Afghan minister's Delhi visit. Defense minister threatens war with India and Afghanistan simultaneously, claiming readiness for any situation despite current ceasefire tensions.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान