शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:48 IST

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडच्या दिवसांत रक्तरंजित संघर्ष दिसून येत आहे. या लढाईत पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले.

कराची - अफगाणिस्तानसोबत लढाईत शेकडो सैनिक मारल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी विनाकारण भारतावर आरोप केले आहेत. अफगाणिस्ताननेभारताच्या इशाऱ्यावर पाकिस्तानवर हल्ला केला, कारण हे हल्ले अशावेळी झाले जेव्हा अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी दिल्लीत होते असा दावा शहबाज शरीफ यांनी केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी टू फ्रंट वॉरवर भाष्य करत भारत पुन्हा युद्ध छेडू शकतो आणि पाकिस्तान त्यासाठी तयार आहे अशी पोकळ धमकी दिली आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडच्या दिवसांत रक्तरंजित संघर्ष दिसून येत आहे. या लढाईत पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर एअर स्ट्राइक केले आहे. त्यात अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. घरे तुटली, शाळा पडल्या. काबुल, पक्तिका, खोस्त, नांगरहर, कंधार आणि इतर प्रांतात पाकिस्तानकडून २० हून अधिक ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आले. या हल्ल्यात १२ तालिबानी नागरिक मृत्युमुखी पडले तर १०० हून अधिक जखमी झालेत. १५-२० तालिबानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सध्या दोन्ही देशात सीजफायर असले तरी तणाव कायम आहे. त्यातच शहबाज शरीफ यांनी आव्हानात्मक भाषा वापरत जर हा सीजफायर केवळ वेळ काढण्यासाठी घेतला असेल तर आम्हाला तो स्वीकार नाही असं सांगितले आहे. त्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत शहबाज यांनी भारताला ओढण्याचा प्रयत्न केला. भारताच्या इशाऱ्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारतात असताना हे हल्ले करण्यात आल्याचे शहबाज शरीफ यांनी म्हटलं. दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनी अफगाणिस्तान आणि भारत या दोघांशी एकाच वेळी युद्ध करण्याची पाकिस्तानची तयारी असल्याचा पोकळ दावा केला आहे.

एका मुलाखतीत पाकिस्तानी संरक्षण मंत्र्‍याला भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो का, तुम्हाला यावर काय वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नक्कीच, हे नाकारू शकत नाही. याची शक्यता अधिक आहे. सध्या परिस्थिती तणावग्रस्त आहे. जर दोन्ही मोर्चावर युद्ध छेडले तर आम्हीही तयार आहोत. मी सार्वजनिकपणे यावर चर्चा करू शकत नाही मात्र आम्ही कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Blames India for Taliban Attack, Threatens War Readiness.

Web Summary : Pakistani PM accuses India of instigating Taliban attacks during Afghan minister's Delhi visit. Defense minister threatens war with India and Afghanistan simultaneously, claiming readiness for any situation despite current ceasefire tensions.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान