शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

दोन देशांमधल्या युद्धाच्या कात्रीत सापडलेल्या निवांत शहराची भकास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 05:51 IST

आर्मेनिया आणि अझरबैजानच्या फौजा एकमेकांना भिडल्या आहेत, रॉकेट हल्ले होत आहेत आणि त्या साऱ्याला लागून असलेलं, आंतरराष्ट्रीय सीमेवरचं आर्टसख रिपब्लिकचं हे मोठं शहर, स्टेपनेकर्ट. त्या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता नसली तरी हे शहर मात्र शांत, सुंदर असं. ते आता होरपळत आहे.

हसत्या खेळत्या माणसांना जिवाच्या भीतीनं पळायला भाग पाडतं, एका रात्रीत ‘शरणार्थी’ बनवतं ते युद्ध. राजकीय पटलांवर आणि अस्मितांच्या टोकदार पटांवर जी मांडणी व्हायची ती होतच असते मात्र त्यात चारचौघांसारखा सामान्य माणूस देशोधडीला लागतो. काळ कोणताही असो, युद्ध माणसांची हीच गत करतं..तेच आज आर्मेनिया आणि अझरबैजानच्या युद्धात दिसतं आहे. १९९० पासून हा प्रदेश अशांत आहे; पण गेल्या २७ सप्टेंबरला युद्धाला तोंड फुटलं आणि हसतीखेळती शहरं आडवी झाली. माणसं जिवाच्या भीतीनं दुसऱ्या देशात आश्रयाला पळू लागली. आणि या साऱ्यात स्टेपनेकर्ट हे शहर बेचिराख होत आहे. रस्त्यावर येऊन पडलेले, मातीत रुतलेले न फुटलेले रॉकेट्स, पडलेल्या इमारती, सिमेंटमातीचा चिखल यातून वाट काढत जिवाच्या भीतीने माणसं घाबरून कुठंकुठं लपत आहेत.आर्मेनिया आणि अझरबैजानच्या फौजा एकमेकांना भिडल्या आहेत, रॉकेट हल्ले होत आहेत आणि त्या साऱ्याला लागून असलेलं, आंतरराष्ट्रीय सीमेवरचं आर्टसख रिपब्लिकचं हे मोठं शहर, स्टेपनेकर्ट. त्या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता नसली तरी हे शहर मात्र शांत, सुंदर असं. ते आता होरपळत आहे. तिथं न फुटलेले रॉकेट्स, त्यांचा मारा, त्यामुळे घरं कोसळणं यांचं चक्र सुरू झालं आहे. रस्त्यावर फळांचे सडे पडलेत, जे हातात आहे ते टाकून माणसं बाजारातून जीव वाचवत पळालेली दिसतात. आर्मेनिया आणि अझरबैजान दोन्हीकडच्या फौजा मानवी आणि संसाधन नुकसानासाठी परस्परांना जबाबदार धरतात. मात्र स्टेपनेकर्ट त्यात जीव मुठीत धरून जगतं आहे. हे शहर डाळिंब, व्होडका आणि जांगिल नावाच्या स्थानिक हर्ब ब्रेडसाठी फार प्रसिद्ध. एरव्ही निवांत, शांत, हसरं शहर. त्या शहरातही अनेक आर्मेनियन शरणार्थी आता दाखल होत आहेत, युद्धानं शहराचा नूर बदलला आहे. सतत होणारा तोफगोळ्यांच्या माºयात हे शहर आपली रौनक तर हरवून बसलंच; पण सामसूम, रिकाम्या घरांचे पडके भुताचे वाडे असावे तसं भासू लागलं आहे.तीन दिवसांपूर्वीपर्यंत या शहरातलं जगणं कुठल्याही शहरात असतं तसंच होतं. सीमेपलीकडे युद्ध पेटलेलं होतं; पण त्याचा थेट परिणाम या शहरावर झालेला नव्हता. मात्र या शहराचे आर्मेनियाशी मायेचे संबंध. त्यामुळे इथे आता साधारण ५५ हजारांच्या आसपास आर्मेनियन शरणार्थी दाखल झाल्याची आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाची माहिती सांगते. शहरातले बाजार बंद झाले, काही इमारती कोसळल्या, अनेक दुकानांच्या खिडक्या पडल्या, फुटल्या आणि सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत.या शहरातली माणसं सांगतात की, सोव्हिएट काळातल्या आठवणी पुन्हा जागा झाल्या आहेत. जागोजागी मिल्ट्रीच्या गाड्या, कुठे पेटती इमारत, जळालेली वाहनं, पडझड झालेल्या भकास इमारती हे सारं चित्र त्याकाळातही दिसायचं. आता इतक्या वर्षांनंतर त्या काळाचं भूत पुन्हा जागं झाल्यासारखं हे शहर भकास आणि भयाण दिसू लागलं आहे. विशेषत: सत्तरी, ऐंशी पार केलेले ज्येष्ठ नागरिक हे हल्ले पाहून फार धास्तावले आहेत. एकेकाळी सोव्हिएट रशियातून वेगळं होण्याच्या काळात त्यांनी हे बॉम्बिंग अनुभवलं आहे. त्याकाळी जिवाच्या भीतीनं कुठंकुठं लपणं आणि आज पुन्हा राहत्या घरावर रॉकेटचा मारा होणं, जीव दडवून कशाखाली तरी लपणं, टोकदार वस्तू निवडत त्या पायाखालून बाजूला करणं हे सारं इथल्या ज्येष्ठांना पुन्हा करावं लागतं आहे. सकाळ होताच तोफगोळ्याचा मारा कमी झाला, सायरन थांबले, की आपल्या जिवाभावाच्या माणसांचं काय झालं हे पाहण्यासाठी काही माणसं सुसाट वेगानं गाड्या काढून निघून जातात. काही सुरक्षित ठिकाणी रवाना होतात, काही मात्र सरकारी शेल्टरमध्ये जाऊन आसरा घेतात. लेकराबाळांच्या खाण्याची काय सोय एवढाच महत्त्वाचा प्रश्न त्यांना छळत असतो. सायंकाळ होता होता पुन्हा सायरन वाजतात, लोक शेल्टरमध्ये लपतात आणि आपला जीव वाचला याबद्दल आभार मानतात.. युद्ध माणसांच्या जगण्यावर असं दहशतीचं सावट धरतं, आणि कोण चूक कोण बरोबर या राजकीय हिशेबात काही जण कायमचं हसणं विसरून जातात..