शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

दोन देशांमधल्या युद्धाच्या कात्रीत सापडलेल्या निवांत शहराची भकास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 05:51 IST

आर्मेनिया आणि अझरबैजानच्या फौजा एकमेकांना भिडल्या आहेत, रॉकेट हल्ले होत आहेत आणि त्या साऱ्याला लागून असलेलं, आंतरराष्ट्रीय सीमेवरचं आर्टसख रिपब्लिकचं हे मोठं शहर, स्टेपनेकर्ट. त्या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता नसली तरी हे शहर मात्र शांत, सुंदर असं. ते आता होरपळत आहे.

हसत्या खेळत्या माणसांना जिवाच्या भीतीनं पळायला भाग पाडतं, एका रात्रीत ‘शरणार्थी’ बनवतं ते युद्ध. राजकीय पटलांवर आणि अस्मितांच्या टोकदार पटांवर जी मांडणी व्हायची ती होतच असते मात्र त्यात चारचौघांसारखा सामान्य माणूस देशोधडीला लागतो. काळ कोणताही असो, युद्ध माणसांची हीच गत करतं..तेच आज आर्मेनिया आणि अझरबैजानच्या युद्धात दिसतं आहे. १९९० पासून हा प्रदेश अशांत आहे; पण गेल्या २७ सप्टेंबरला युद्धाला तोंड फुटलं आणि हसतीखेळती शहरं आडवी झाली. माणसं जिवाच्या भीतीनं दुसऱ्या देशात आश्रयाला पळू लागली. आणि या साऱ्यात स्टेपनेकर्ट हे शहर बेचिराख होत आहे. रस्त्यावर येऊन पडलेले, मातीत रुतलेले न फुटलेले रॉकेट्स, पडलेल्या इमारती, सिमेंटमातीचा चिखल यातून वाट काढत जिवाच्या भीतीने माणसं घाबरून कुठंकुठं लपत आहेत.आर्मेनिया आणि अझरबैजानच्या फौजा एकमेकांना भिडल्या आहेत, रॉकेट हल्ले होत आहेत आणि त्या साऱ्याला लागून असलेलं, आंतरराष्ट्रीय सीमेवरचं आर्टसख रिपब्लिकचं हे मोठं शहर, स्टेपनेकर्ट. त्या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता नसली तरी हे शहर मात्र शांत, सुंदर असं. ते आता होरपळत आहे. तिथं न फुटलेले रॉकेट्स, त्यांचा मारा, त्यामुळे घरं कोसळणं यांचं चक्र सुरू झालं आहे. रस्त्यावर फळांचे सडे पडलेत, जे हातात आहे ते टाकून माणसं बाजारातून जीव वाचवत पळालेली दिसतात. आर्मेनिया आणि अझरबैजान दोन्हीकडच्या फौजा मानवी आणि संसाधन नुकसानासाठी परस्परांना जबाबदार धरतात. मात्र स्टेपनेकर्ट त्यात जीव मुठीत धरून जगतं आहे. हे शहर डाळिंब, व्होडका आणि जांगिल नावाच्या स्थानिक हर्ब ब्रेडसाठी फार प्रसिद्ध. एरव्ही निवांत, शांत, हसरं शहर. त्या शहरातही अनेक आर्मेनियन शरणार्थी आता दाखल होत आहेत, युद्धानं शहराचा नूर बदलला आहे. सतत होणारा तोफगोळ्यांच्या माºयात हे शहर आपली रौनक तर हरवून बसलंच; पण सामसूम, रिकाम्या घरांचे पडके भुताचे वाडे असावे तसं भासू लागलं आहे.तीन दिवसांपूर्वीपर्यंत या शहरातलं जगणं कुठल्याही शहरात असतं तसंच होतं. सीमेपलीकडे युद्ध पेटलेलं होतं; पण त्याचा थेट परिणाम या शहरावर झालेला नव्हता. मात्र या शहराचे आर्मेनियाशी मायेचे संबंध. त्यामुळे इथे आता साधारण ५५ हजारांच्या आसपास आर्मेनियन शरणार्थी दाखल झाल्याची आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाची माहिती सांगते. शहरातले बाजार बंद झाले, काही इमारती कोसळल्या, अनेक दुकानांच्या खिडक्या पडल्या, फुटल्या आणि सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत.या शहरातली माणसं सांगतात की, सोव्हिएट काळातल्या आठवणी पुन्हा जागा झाल्या आहेत. जागोजागी मिल्ट्रीच्या गाड्या, कुठे पेटती इमारत, जळालेली वाहनं, पडझड झालेल्या भकास इमारती हे सारं चित्र त्याकाळातही दिसायचं. आता इतक्या वर्षांनंतर त्या काळाचं भूत पुन्हा जागं झाल्यासारखं हे शहर भकास आणि भयाण दिसू लागलं आहे. विशेषत: सत्तरी, ऐंशी पार केलेले ज्येष्ठ नागरिक हे हल्ले पाहून फार धास्तावले आहेत. एकेकाळी सोव्हिएट रशियातून वेगळं होण्याच्या काळात त्यांनी हे बॉम्बिंग अनुभवलं आहे. त्याकाळी जिवाच्या भीतीनं कुठंकुठं लपणं आणि आज पुन्हा राहत्या घरावर रॉकेटचा मारा होणं, जीव दडवून कशाखाली तरी लपणं, टोकदार वस्तू निवडत त्या पायाखालून बाजूला करणं हे सारं इथल्या ज्येष्ठांना पुन्हा करावं लागतं आहे. सकाळ होताच तोफगोळ्याचा मारा कमी झाला, सायरन थांबले, की आपल्या जिवाभावाच्या माणसांचं काय झालं हे पाहण्यासाठी काही माणसं सुसाट वेगानं गाड्या काढून निघून जातात. काही सुरक्षित ठिकाणी रवाना होतात, काही मात्र सरकारी शेल्टरमध्ये जाऊन आसरा घेतात. लेकराबाळांच्या खाण्याची काय सोय एवढाच महत्त्वाचा प्रश्न त्यांना छळत असतो. सायंकाळ होता होता पुन्हा सायरन वाजतात, लोक शेल्टरमध्ये लपतात आणि आपला जीव वाचला याबद्दल आभार मानतात.. युद्ध माणसांच्या जगण्यावर असं दहशतीचं सावट धरतं, आणि कोण चूक कोण बरोबर या राजकीय हिशेबात काही जण कायमचं हसणं विसरून जातात..