शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

गलवान संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले; जयशंकर म्हणाले चीन खोटारडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:03 IST

...तर संपूर्ण जगावर परिणाम : जयशंकर

न्यूयॉर्क : २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध “सामान्य” नाहीत आणि कदाचित हा मुद्दा अपेक्षेपेक्षा जास्त काळ पुढे ताणला जाऊ शकतो. सीमेवर आपले सैन्य जमविण्याबाबत चीनने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण न पटण्यासारखे आहे, असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे.

परराष्ट्रमंत्री सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, पूर्व लडाखच्या सीमेवर परिस्थिती सामान्य नाही, याबाबत भारत सतत आवाज उठवत आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी सीमेवर शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे. परराष्ट्र संबंध परिषदेत भारत-चीन संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, जगातील दोन मोठ्या देशांमध्ये एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम सर्व जगावर होईल.कठोर लॉकडाऊन असताना...

ते म्हणाले की, १९९३ आणि १९९६ मध्ये भारताने चीनसोबत सीमा स्थिरतेसाठी दोन करार केले. भारत किंवा चीन दोघेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य जमा करणार नाहीत आणि जर दोन्ही बाजूंनी ठरावीक संख्येपेक्षा जास्त सैन्य आणले तर ते दुसऱ्या बाजूला कळवतील, असे यात स्पष्टपणे म्हटले होते. २०२० पर्यंत हीच परिस्थिती होती. मात्र, कोरोनात आम्ही मोठ्या संख्येने चिनी सैन्य सीमेवर जाताना पाहिले. त्यानंतर दोन्ही देशांत संघर्ष झाला आणि आमचे २० सैनिक शहीद झाले, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्री म्हणाले..n सध्या दोन्ही देशांत चर्चा सुरू असली तरी चीनकडून करारांचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने सैनिक सीमेवर तैनातn चीनशी सध्या सामान्यपणे वागणे खूप कठीण. चिनी नौदलाची झपाट्याने वाढ होत आहे. ते कुठेतरी तैनात करण्याचा त्यांचा विचार असेल n चीनच्या आव्हानाला हे सरकार चोख प्रत्युत्तर देईल.

चीन खोटारडा २००९ ते २०१३ या काळात चीनमध्ये भारताचे राजदूत राहिलेले जयशंकर म्हणाले, की,  चीनसोबतच्या संबंधांची खासियत ही आहे की ते असे का करतात हे ते कधीच सांगत नाहीत. आपण ज्यावेळी याचा शोध घ्यायला जातो, त्यावेळी अनेक बाबी संदिग्ध राहतात. चीनने याबाबत अनेक स्पष्टीकरणे दिली आहेत, परंतु त्यापैकी एकही खरे नाही.

भूमिका बदललीपरराष्ट्र मंत्री म्हणाले की, ज्या देशाने करार मोडले आहेत, त्यांच्याशी सामान्य राहण्याचा प्रयत्न करणे खूप कठीण आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर ही काही सामान्य परिस्थिती नाही. दोन्ही देशांतील संपर्क बिघडला आहे. प्रवास थांबला आहे.  आमच्याकडे लष्करी तणाव नक्कीच जास्त आहे. याचा परिणाम भारताच्या चीनबाबतच्या भूमिकेवरही झाला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर