शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

गलवान संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले; जयशंकर म्हणाले चीन खोटारडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:03 IST

...तर संपूर्ण जगावर परिणाम : जयशंकर

न्यूयॉर्क : २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध “सामान्य” नाहीत आणि कदाचित हा मुद्दा अपेक्षेपेक्षा जास्त काळ पुढे ताणला जाऊ शकतो. सीमेवर आपले सैन्य जमविण्याबाबत चीनने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण न पटण्यासारखे आहे, असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे.

परराष्ट्रमंत्री सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, पूर्व लडाखच्या सीमेवर परिस्थिती सामान्य नाही, याबाबत भारत सतत आवाज उठवत आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी सीमेवर शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे. परराष्ट्र संबंध परिषदेत भारत-चीन संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, जगातील दोन मोठ्या देशांमध्ये एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम सर्व जगावर होईल.कठोर लॉकडाऊन असताना...

ते म्हणाले की, १९९३ आणि १९९६ मध्ये भारताने चीनसोबत सीमा स्थिरतेसाठी दोन करार केले. भारत किंवा चीन दोघेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य जमा करणार नाहीत आणि जर दोन्ही बाजूंनी ठरावीक संख्येपेक्षा जास्त सैन्य आणले तर ते दुसऱ्या बाजूला कळवतील, असे यात स्पष्टपणे म्हटले होते. २०२० पर्यंत हीच परिस्थिती होती. मात्र, कोरोनात आम्ही मोठ्या संख्येने चिनी सैन्य सीमेवर जाताना पाहिले. त्यानंतर दोन्ही देशांत संघर्ष झाला आणि आमचे २० सैनिक शहीद झाले, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्री म्हणाले..n सध्या दोन्ही देशांत चर्चा सुरू असली तरी चीनकडून करारांचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने सैनिक सीमेवर तैनातn चीनशी सध्या सामान्यपणे वागणे खूप कठीण. चिनी नौदलाची झपाट्याने वाढ होत आहे. ते कुठेतरी तैनात करण्याचा त्यांचा विचार असेल n चीनच्या आव्हानाला हे सरकार चोख प्रत्युत्तर देईल.

चीन खोटारडा २००९ ते २०१३ या काळात चीनमध्ये भारताचे राजदूत राहिलेले जयशंकर म्हणाले, की,  चीनसोबतच्या संबंधांची खासियत ही आहे की ते असे का करतात हे ते कधीच सांगत नाहीत. आपण ज्यावेळी याचा शोध घ्यायला जातो, त्यावेळी अनेक बाबी संदिग्ध राहतात. चीनने याबाबत अनेक स्पष्टीकरणे दिली आहेत, परंतु त्यापैकी एकही खरे नाही.

भूमिका बदललीपरराष्ट्र मंत्री म्हणाले की, ज्या देशाने करार मोडले आहेत, त्यांच्याशी सामान्य राहण्याचा प्रयत्न करणे खूप कठीण आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर ही काही सामान्य परिस्थिती नाही. दोन्ही देशांतील संपर्क बिघडला आहे. प्रवास थांबला आहे.  आमच्याकडे लष्करी तणाव नक्कीच जास्त आहे. याचा परिणाम भारताच्या चीनबाबतच्या भूमिकेवरही झाला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर