शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पाण्याने होईल भारतीयांची बचत

By admin | Updated: June 26, 2015 23:41 IST

पावसाचे पाणी भारतीय नागरिकांसाठी एक वरदान आहे. हे पाणी वाचवून भाज्यांच्या रोपांना घातल्यास विजेचे बिल कमी होते, कॅलरीजयुक्त आहार मिळतो,

वॉशिंग्टन : पावसाचे पाणी भारतीय नागरिकांसाठी एक वरदान आहे. हे पाणी वाचवून भाज्यांच्या रोपांना घातल्यास विजेचे बिल कमी होते, कॅलरीजयुक्त आहार मिळतो, एवढेच नाही तर पाऊस भारतीयांसाठी उत्पन्नाचे एक स्रोत बनू शकतो, असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. नासाच्या पर्जन्यविषयक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. नासाची पर्जन्यविषयक मापन मोहीम व जपानच्या अंतराळ संस्थेच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला असून, अर्बन वॉटर जर्नलमध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. १९९७ ते २०१५ यादरम्यान विविध प्रदेश व उपप्रदेशात झालेल्या पावसाच्या पाहणीवर हे निष्कर्ष काढण्यात आले. भारतात सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे ही कठीण बाब आहे. हे पाणी छोट्या टाकीत साठवून ठेवल्यास पिण्यासाठी चांगले पाणी मिळू शकते, असे या संशोधनाचे प्रमुख डॅन स्टाऊट यांनी म्हटले आहे. डॅन स्टाऊट हे उटाह विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंग खात्याचे सहायक संशोधक असून त्यांच्यासह तीन संशोधकांनी हे संशोधन केले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग ही कल्पना नवी नाही; पण अजूनही भारतात तिचा फारसा उपयोग होत नाही. पावसाचे पाणी साठवणे वा रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे हा भारताच्या पाणी समस्येवरील मोठा उपाय आहे. भारतात जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी साठवले जाते. त्यामुळे तात्काळ वापरासाठी हे पाणी उपलब्ध होत नाही. याऐवजी भारतीय नागरिकांनी २०० गॅलनच्या टाकीत पावसाचे पाणी साठवले, तर ते त्यांना सहज वापरता येईल. दाट लोकसंख्या असणाऱ्या शहरी भागातही हा प्रयोग यशस्वी होईल. भारतातील वाढत्या शहरांना या पद्धतीने पाणी पुरवणे सहज शक्य होईल. स्टाऊट यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या बहुतांश भागात पावसाचे पाणी साठविले जात नाही. जिथे ते साठवले जाते, तिथे कड्या कुलुपे लावून बंद ठेवण्यात येते. देशाच्या काही भागात सरासरी पाणी साठवले जाते; पण तेवढे पुरेसे नाही. (वृत्तसंस्था)