शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:32 IST

Congress Rahul Gandhi Tour Colombia: भारत आणि चीन पुढील ५० वर्षांत जगाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत का? या प्रश्नावर राहुल गांधी यांनी भारताबाबत नकारात्मक उत्तर दिले.

Congress Rahul Gandhi Tour Colombia: आर्थिक विकासाबरोबरच भारत नव्या नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. कारण, अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यात असमर्थ ठरत आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणारे बहुतेक लोक असे आहेत की, ज्यांनी त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील नोकऱ्या गमावल्या आहेत. चीनने लोकशाही नसलेल्या वातावरणात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर भर दिला अन् करून दाखवले आहे. परंतु आपल्याला लोकशाही चौकटीची आवश्यकता आहे. आपले आव्हान म्हणजे चीनशी स्पर्धा करू शकणाऱ्या लोकशाही व्यवस्थेत मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल विकसित करणे, असे सांगत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली. राहुल गांधीकोलंबिया दौऱ्यावर आहेत आणि एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातील लोकशाहीवर टीका केली. 

कोलंबियातील इआयए विद्यापीठात एक संवाद कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्थेत या सर्वांना जागा आहे; मात्र असे असले तरी सध्या तेथील लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूंनी हल्ला होत आहे. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांना विचारण्यात आले की, भारत आणि चीन पुढील ५० वर्षांत जगाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत का? यावर राहुल गांधी म्हणाले की, मला चीनबद्दल माहिती नाही, पण मला वाटत नाही की, भारत स्वतःला जागतिक नेतृत्व म्हणून पाहतो. भारत हा चीनचा शेजारी आणि अमेरिकेचा जवळचा भागीदार देश आहे. आपण या दोन शक्तींच्या अगदी जवळ आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

लोकशाहीवर सतत होणारा हल्ला हा सर्वांत मोठा धोका

भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे. याबद्दल अत्यंत आशावादी आहे. भारतीय व्यवस्थेत काही त्रुटी आणि धोके आहेत, ज्या भारताने दूर केल्या पाहिजेत. सर्वांत मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर सतत होणारा हल्ला. भारत हा त्याच्या सर्व देशवासींमध्ये संवादाचे केंद्र आहे. वेगवेगळ्या परंपरा, धर्म आणि विचारांना जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. दुसरे म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी विभागणी. येथे अंदाजे १६-१७ वेगवेगळ्या भाषा आणि धर्म आहेत. या विविध परंपरांना व्यक्त होऊ देणे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चीन जे करतो ते आपण करू शकत नाही - लोकांना दडपून टाकणे आणि हुकूमशाही व्यवस्था चालवणे. आपली व्यवस्था ते सहन करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभियान प्रामुख्याने तेथील बेरोजगारीसंदर्भात आहे. जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रासंगिकतेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, १.४ अब्ज लोकसंख्येसह भारतात प्रचंड क्षमता आहे. परंतु भारताची व्यवस्था चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चीन खूप केंद्रीकृत आणि एकसमान आहे. भारत विकेंद्रित आहे आणि त्यात अनेक भाषा, संस्कृती, परंपरा आणि धर्म आहेत. भारताची व्यवस्था खूपच गुंतागुंतीची आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Democracy under attack: Rahul Gandhi criticizes India from Colombia.

Web Summary : Rahul Gandhi, in Colombia, criticized India's democratic system, citing attacks on it. He highlighted challenges in manufacturing and competing with China's model, emphasizing India's diverse traditions and the need for a robust democratic framework.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसdemocracyलोकशाहीColombiaकोलंबिया