शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 08:47 IST

चीन आणि पाकिस्तानच्या या दाव्यांच्या विरोधात, भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. सुरुवातीपासूनच, भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला किंवा मध्यस्थीला स्पष्टपणे नकार दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. दोन्ही देशांमध्ये हल्ले प्रतिहल्ले झाले होते, यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाले होते. या युद्विरामचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले. याला पाकिस्तानने दुजोरा दिला होता. आता चीननेही मध्यस्ती केल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण खेळात पाकिस्तानने सर्वात मनोरंजक भूमिका बजावली आहे. या प्रयत्नांचे श्रेय पूर्वी अमेरिकेला देणारा पाकिस्तान आता आपली भूमिका बदलताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये बीजिंगने "मध्यस्थ" म्हणून काम केले या चीनच्या दाव्याला पाकिस्तानने दुजोरा दिला आहे.

सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून

पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी म्हणाले, ६ मे ते १० मे या अत्यंत तणावपूर्ण दिवसांत चिनी नेतृत्व पाकिस्तानशी सतत संपर्कात होते. चीनने केवळ पाकिस्तानीच नव्हे तर भारतीय नेतृत्वाशीही संपर्क साधला होता. चीनच्या सक्रिय आणि "सकारात्मक राजनैतिक कूटनीतिमुळे" सीमेवरील तणाव कमी झाला आणि युद्धसदृश परिस्थिती टाळता आली, असे पाकिस्तानचे मत आहे.

भारताचा स्पष्ट नकार

चीन आणि पाकिस्तानच्या या दाव्यांच्या विरोधात भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. सुरुवातीपासूनच, भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला किंवा मध्यस्थीला स्पष्टपणे नकार दिला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान युद्धबंदी कोणत्याही परकीय दबावामुळे नव्हती, तर ती जमिनीवरील वास्तव आणि लष्करी संवादामुळे होती. भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी लष्करी ऑपरेशन्स महासंचालक यांनी त्यांच्या भारतीय समकक्षांशी संपर्क साधला आणि युद्धबंदीची विनंती केली, त्यानंतर शांतता प्रस्थापित झाली. भारताने यापूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचा मध्यस्थीचा दावा फेटाळून लावला होता.

पाकिस्तानने विधान बदलले

पाकिस्तानच्या ताज्या विधानामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे "विलंब". इतके दिवस मौन बाळगल्यानंतर, अचानक चीनला श्रेय देणे हे पाकिस्तानच्या बदललेल्या राजनैतिक रणनीतीचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान यापूर्वी या संपूर्ण प्रकरणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत होता. चीनला अचानक मिळालेल्या या पाठिंब्यावरून असे दिसून येते की पाकिस्तान या प्रदेशात बीजिंगचा प्रभाव आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानchinaचीनAmericaअमेरिका