शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

भारताच्या इफ्तार पार्टीत पाकची कागाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 3:09 AM

पाहुण्यांना धमकाविले; सुरक्षारक्षकांनी गेटवरूनच काही जणांना परत पाठविले

इस्लामाबाद : भारतीय उच्च आयुक्तालयाने इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याचा तसेच त्यांना धमकाविल्याचा प्रकार घडला आहे. वाजवीपेक्षा जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवून काही पाहुण्यांना परतही पाठविण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढणार आहे.

भारतीय उच्चायुक्त अजय बिसेरिया यांनी येथील सेरेना हॉटेलमध्ये आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला पाकिस्तानातील अनेक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने सांगितले की, ज्यांच्याकडे निमंत्रणपत्रिका व ओळखपत्र होते त्यांनाच हॉटेलच्या आतमध्ये सोडण्यात येत होते. प्रख्यात पत्रकार मेहरिन जेहरा-मलिक यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, भारताने आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला जाऊ इच्छिणाºया प्रत्येकाशी दहशतवादविरोधी पथकाचे सुरक्षा जवान गैरवर्तन करत होते. या कार्यक्रमाला जाऊ नका, असे दूरध्वनी अज्ञात व्यक्तीने निमंत्रितांना केल्याचेही उघडकीस आले आहे. पाकिस्तानने भारताला जशास तसे उत्तर देण्याच्या नावाखाली इफ्तार पार्टीत केलेला प्रकार मूर्खपणाचा होता, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर जानेवारी २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानशी सुरु असलेली चर्चा थांबविली आहे. यंदा १४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोटवर हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी विमानांनी हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. तेव्हापासून दोन्ही देशात मोठा तणाव आहे.

कार्यक्रम रद्द केल्याची थापपाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते फरहतुल्ला बाबर यांनी सांगितले की, सेरेना हॉटेलभोवती सर्वत्र बॅरिकेड ठेवण्यात आले होते. भारताने दिलेली इफ्तार पार्टी रद्द झाल्याचे सुरक्षा जवानांकडून काही निमंत्रितांना सांगण्यात आले. हॉटेलचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. शेवटी चिकाटीने प्रयत्न करून बाबर यांनी सेरेना हॉटेलमध्ये प्रवेश केला व इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यावेळी भारतीय उच्चायुक्त अजय बिसेरिया यांनी सांगितले, इफ्तार पार्टीला येताना निमंत्रितांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी काही निमंत्रित लाहोर, कराची या शहरांतूनही आले होते.

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान