शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 15:58 IST

भारत नागरिकता कायद्याच्या माध्यमाने बांगलादेश, नेपाळ-चीनसोबत सीमा वाद आणि पाकिस्तानला लष्करी कारवाईची पोकळ धमकी देत आहे, असे इम्रान यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र, आपला पूर्ण वेळ भारताविरोधात गरळ ओकण्यातच खर्च करत आहेत.इम्रान यांनी नेपाळ आणि चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.फॅसिस्ट मोदी सरकार भारतातील अल्पसंख्यकांना केवळ दुय्यम नागरिकत्वच देत नाही, तर क्षेत्रीय शांततेसाठीही धोक्याचे आहे, असेही इम्रान म्हणाले.

इस्लामाबाद : कोरोना संकटाच्या काळात जगातील सर्वच देशांचे प्रमुख कोरनावर कशापद्धतीने मात करतायेईल, यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावत आहेत. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र, आपला पूर्ण वेळ भारताविरोधात गरळ ओकण्यातच खर्च करत आहेत. आता त्यांनी नेपाळ आणि चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारची नाझीवादाशी तुलना -इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे, की हिदुत्ववादी मोदी सरकारची अभिमानी विस्तारवादाची भूमिका नाझी विचार धारेप्रमाणे आहे. भारत आपल्या शेजाऱ्यांसाठी धोका बनत चालला आहे. तो नागरिकता कायद्याच्या माध्यमाने बांगलादेश, नेपाळ-चीनसोबत सीमा वाद आणि पाकिस्तानला खोट्या लष्करी कारवाईच्या माध्यमाने धमक्या देत आहे. 

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

दुसऱ्या एका ट्विटमध्ये इम्रान म्हणाले, जम्मू-काश्मीरवर अवैध कब्जा, चौथ्या जेनेव्हा कन्व्हेंशअंतर्गत युद्ध अपराध आणि तो पाकिस्तान अधिकृत काश्मीरवर दावा करत आहे. फॅसिस्ट मोदी सरकार भारतातील अल्पसंख्यकांना केवळ दुय्यम नागरिकत्वच देत नाही, तर क्षेत्रीय शांततेसाठीही धोक्याचे आहे. यापूर्वीही इम्रान यांनी काश्मीर मुद्यावरून अनेक वेळा भारताविरोधात गरळ ओकली आहे.

भारताविरोधात यापूर्वीही इम्रान यांनी गरळ ओकली आहे - इम्रान यांचे भारतावर टीका करणे नवे नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा भारतावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्विट करत, काश्मीरसंदर्भातील मोदींची भूमीका ही आरएसएस प्रेरित असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर कश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांसोबत मोदी सरकार क्रुरपणे वाग आहे. असा आरोपही इम्रान यांनी केला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाchinaचीनNepalनेपाळ