शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 15:58 IST

भारत नागरिकता कायद्याच्या माध्यमाने बांगलादेश, नेपाळ-चीनसोबत सीमा वाद आणि पाकिस्तानला लष्करी कारवाईची पोकळ धमकी देत आहे, असे इम्रान यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र, आपला पूर्ण वेळ भारताविरोधात गरळ ओकण्यातच खर्च करत आहेत.इम्रान यांनी नेपाळ आणि चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.फॅसिस्ट मोदी सरकार भारतातील अल्पसंख्यकांना केवळ दुय्यम नागरिकत्वच देत नाही, तर क्षेत्रीय शांततेसाठीही धोक्याचे आहे, असेही इम्रान म्हणाले.

इस्लामाबाद : कोरोना संकटाच्या काळात जगातील सर्वच देशांचे प्रमुख कोरनावर कशापद्धतीने मात करतायेईल, यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावत आहेत. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र, आपला पूर्ण वेळ भारताविरोधात गरळ ओकण्यातच खर्च करत आहेत. आता त्यांनी नेपाळ आणि चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारची नाझीवादाशी तुलना -इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे, की हिदुत्ववादी मोदी सरकारची अभिमानी विस्तारवादाची भूमिका नाझी विचार धारेप्रमाणे आहे. भारत आपल्या शेजाऱ्यांसाठी धोका बनत चालला आहे. तो नागरिकता कायद्याच्या माध्यमाने बांगलादेश, नेपाळ-चीनसोबत सीमा वाद आणि पाकिस्तानला खोट्या लष्करी कारवाईच्या माध्यमाने धमक्या देत आहे. 

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

दुसऱ्या एका ट्विटमध्ये इम्रान म्हणाले, जम्मू-काश्मीरवर अवैध कब्जा, चौथ्या जेनेव्हा कन्व्हेंशअंतर्गत युद्ध अपराध आणि तो पाकिस्तान अधिकृत काश्मीरवर दावा करत आहे. फॅसिस्ट मोदी सरकार भारतातील अल्पसंख्यकांना केवळ दुय्यम नागरिकत्वच देत नाही, तर क्षेत्रीय शांततेसाठीही धोक्याचे आहे. यापूर्वीही इम्रान यांनी काश्मीर मुद्यावरून अनेक वेळा भारताविरोधात गरळ ओकली आहे.

भारताविरोधात यापूर्वीही इम्रान यांनी गरळ ओकली आहे - इम्रान यांचे भारतावर टीका करणे नवे नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा भारतावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्विट करत, काश्मीरसंदर्भातील मोदींची भूमीका ही आरएसएस प्रेरित असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर कश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांसोबत मोदी सरकार क्रुरपणे वाग आहे. असा आरोपही इम्रान यांनी केला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाchinaचीनNepalनेपाळ