शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:11 IST

India Pakistan War, Missile Drone Attack Location: भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही.

India Pakistan War, Missile Drone Attack Location: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे निराश झालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गुरुवारी पहाटे पाकिस्तानने जम्मू आणि पठाणकोटसह अनेक संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यानंतर दिवसभरात भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. त्यानंतर आज संध्याकाळपासून पाकिस्तानने पुन्हा हल्ला करण्यात सुरुवात केली. पाकिस्तानने एकाच वेळी आठ क्षेपणास्त्रांनी जम्मू नागरी विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि आसपासच्या परिसरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही.

कुपवाडामध्ये जोरदार गोळीबार

क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान जम्मूच्या अखनूर भागात युद्धाच्या सायरनचे आवाज ऐकू आले. त्याच वेळी, काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सीमेपलीकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. निवासी भागांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. तथापि, भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जम्मू प्रदेशात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पठाणकोट एअरबेसवरील हल्लाही अयशस्वी

पाकिस्तानने जम्मूसह पठाणकोट एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही भारतीय हवाई संरक्षण दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावले. पठाणकोटसारख्या संवेदनशील लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न हेच दर्शवितो की पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताला चिथावणी देऊ इच्छित आहे. परंतु भारतीय सैन्यदल सज्ज असल्याने पाकिस्तानचे सर्व कट वेळीच उधळून लावण्यात आले आहेत.

२४ तासांत दुसरा अयशस्वी हल्ला

ऑपरेशन सिंदूरनंतर २४ तासांत पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याची कमकुवत बाजू उघडकीस आणली. त्यांची निराशा त्यांच्या मानसिकतेतून दिसून येते आहे. आता भारतीय लष्कराने सीमेवर देखरेख वाढवली आहे आणि कोणताही नवीन हल्ला रोखण्यासाठी ते पूर्णपणे सतर्क आहेत. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान