शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

अयोध्येत मोदींचं 'जय श्रीराम' अन् पाकिस्ताननं आळवला वेगळाच राग; इम्रान खान म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 19:04 IST

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा तीळपापड

इस्लामाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केलं. त्यामुळे आता भव्य दिव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला. या घटनेच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला पाकिस्ताननं नवा नकाशा प्रसिद्ध करत काश्मीरमधील वादग्रस्त भागावर दावा सांगितला. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कलम ३७० वर पुन्हा भाष्य केलं आहे. भारतानं गेल्या वर्षी उचलेलं पाऊल एक मोठी चूक होती आणि आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फसले आहेत, असं खान यांनी म्हटलं आहे. 'काश्मीरला भारतापासून लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल. पंतप्रधान मोदींनी गेल्या ५ ऑगस्टला एक मोठी चूक केली. मोदींना आधी कलम ३७० हटवण्याची भीती वाटत होती. मात्र निवडणूक समोर असल्यानं हिंदूना खूष करण्यासाठी त्यांनी इतका मोठा चुकीचा निर्णय घेतला,' असं खान म्हणाले आहेत. काश्मीरमध्ये संघाच्या ठगांना दहशतवादासाठी सोडू आणि मग काश्मीर हार मानेल, असं पंतप्रधान मोदींना वाटलं होतं, असा आरोप खान यांनी केला. 'पाकिस्तान मैत्री करू पाहतोय, म्हणून तो गप्प बसले, असं मोदींना वाटलं. आमचं सरकार येण्याआधी काश्मीरमध्ये पॅलेट गन्सचा वापर केला जात होता, त्यावेळी कोणीच तिथल्या नागरिकांशी संवाद साधत नव्हतं. पाकिस्तानही नाही आणि संयुक्त राष्ट्रदेखील नाही. त्यामुळेच मोदींनी अहंकाराच्या भावनेतून ५ ऑगस्टला कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण जग आपल्या बाजूनं उभं राहील, असं मोदींना वाटलं. कारण पाश्चिमात्य देशांना चीनविरोधात भारताचा वापर करून घ्यायचा आहे,' असं खान म्हणाले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान