शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:37 IST

Operation Sindoor: भारतीय सैन्याने हवाई हल्ला करुन पाकिस्तानातील नूर खान-शोरकोट हवाई तळांचे नुकसान केल्याचेही पाक मंत्र्यांनी सांगितले.

Operation Sindoor: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारेपाकिस्तानात घुसून जोरदार हल्ले केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविराम जाहीर करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण भारताने त्यांच्या मध्यस्थीच्या दाव्याचे वारंवार खंडन केले. पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारताने युद्धविरामास होकार दिल्याचे मोदी सरकारने म्हटले. आता पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याची पुष्टी केली आहे.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान याची पुष्टी केली. इशाक दार म्हणाले की, भारताने पाकिस्तानच्या दोन प्रमुख हवाई तळांवर(नूर खान आणि शोरकोट) हल्ला केला होता. ६-७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत होता, तेव्हा भारताने हवाई हल्ला करुन पाकिस्तानी हवाई तळांचे मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे, पाकिस्तानी सरकार आणि सैन्य यापूर्वी वारंवार भारताने हल्ला केल्याचेे नाकारत होते. परंतु आता स्वतः उपपंतप्रधानांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे.

इशाक दार यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात सौदी अरेबियाची महत्वाची भूमिका असल्याचे म्हटले. ते म्हणाले, भारतीय सैन्याच्या हल्ल्यांनंतर सुमारे ४५ मिनिटांनी सौदी अरेबियाचे राजकुमार फैसल यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली. राजकुमारांनी विचारले की, मी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलू का? जर पाकिस्तान थांबण्यास तयार असेल तर भारतही थांबू शकतो. मी त्यांना तात्काळ होकार दिला. राजकुमारांनी काही वेळाने पुन्हा फोन केला आणि सांगितले की, त्यांनी जयशंकर यांच्याशी चर्चा केली असून, भारत युद्धविरामास तयार आहे. 

दरम्यान, इशाक दार यांच्या या दाव्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानने विनंती केली होती, यात अमेरिकेचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता. मात्र, त्यांच्या दाव्यानुसार, यात सौदी अरेबियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता यावर अद्याप भारताकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पहलगाम हल्ला अन् भारताचे प्रत्युत्तर२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. त्यानंतर, पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढतच गेला. पुढे पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम झाला, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने वारंवार त्यांचा दावा खोडून काढला. आता पाकिस्ताननेही दोन्ही शेजारी देशांमधील मध्यस्थ म्हणून अमेरिकेची भूमिका नाकारली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प