शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मसूदच्या खानदानाचा केला खात्मा; म्हणतो, मी मेलो असतो तर बरे झाले असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 06:32 IST

Operation Sindoor: मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे.

लाहोर : भारताने टार्गेट केलेल्या दहशतवादी ठिकाणांमध्ये जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. याठिकाणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे कुटुंब होते. या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळच्या ४ जणांचा मृत्यू झाला. मसूदनेच हे कबूल केले आहे.  

या हल्ल्यानंतर मसूद अजहरने म्हटले की, भारतीय हल्ल्यात माझ्या कुटुंबाचे १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले. या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते. मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ साहबचे पूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफचे नातवंडे, बाजी सादियाचा पती आणि तिच्या मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले आहेत. हल्ल्यात अजहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारीही ठार झाले. महिला आणि मुले मारली गेली, असे जैश ए मोहम्मद संघटनेने म्हटले आहे.

कोण आहे मसूद अजहर? मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहर भारताच्या ताब्यात होता. मात्र १९९९ आयसी-८१४ या इंडियन एअरलाईन्सच्या हायजॅकनंतर बंधक नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले होते. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. त्यानंतर बहावलपूर हा जैशचा मुख्य अड्डा बनला होता. 

प्रत्येक युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली१९४७ (पहिले भारत-पाक युद्ध) : भारत व पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नावरून १९४७ साली पहिले युद्ध झाले. जम्मू-काश्मीर संस्थान कोणाच्या ताब्यात राहणार या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला. पाकच्या मदतीने काश्मीरवर हल्ला झाला. महाराज हरीसिंह यांनी जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण केल्यानंतर भारताने सैन्य पाठवले आणि पाकिस्तानविरोधात संपूर्ण युद्ध सुरू झाले. हे युद्ध पाकिस्तान हरला.  

१९६५ (दुसरे भारत-पाक युद्ध) : ५ ऑगस्ट १९६५ रोजी काश्मीरवरून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भडकले. पाकिस्तानने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ अंतर्गत हजारो सैनिकांना स्थानिक बंडखोरांच्या वेशात भारतात घुसवले. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. सीमाभागात जोरदार लढाई झाली. पाकचा पराभव झाला.  

१९७१ (बांगलादेश मुक्तिसंग्राम) : पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीमुळे आणि स्थानिकांच्या स्वातंत्र्याच्या मागणीमुळे १९७१ मध्ये युद्ध सुरू झाले. भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला. पाकिस्तानने शरणागती पत्करली. बांगलादेश स्वतंत्र झाला. १९९९ (कारगिल युद्ध) : मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या कारगिल भागातील उंच टेकड्यांवर पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी कब्जा केला. भारताने ‘ऑपरेशन विजय’ ही कारवाई करून तसेच शेकडो जवानांनी बलिदान देऊन हा भाग परत मिळविला.  

२०१६ (सर्जिकल स्ट्राइक) : १८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने नियंत्रणरेषा पार करून सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.२०१९ (एअर स्ट्राइक) : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला, ज्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानात घुसुन जैशच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला.

टॅग्स :masood azharमसूद अजहरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक