शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

मसूदच्या खानदानाचा केला खात्मा; म्हणतो, मी मेलो असतो तर बरे झाले असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 06:32 IST

Operation Sindoor: मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे.

लाहोर : भारताने टार्गेट केलेल्या दहशतवादी ठिकाणांमध्ये जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. याठिकाणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे कुटुंब होते. या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळच्या ४ जणांचा मृत्यू झाला. मसूदनेच हे कबूल केले आहे.  

या हल्ल्यानंतर मसूद अजहरने म्हटले की, भारतीय हल्ल्यात माझ्या कुटुंबाचे १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले. या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते. मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ साहबचे पूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफचे नातवंडे, बाजी सादियाचा पती आणि तिच्या मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले आहेत. हल्ल्यात अजहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारीही ठार झाले. महिला आणि मुले मारली गेली, असे जैश ए मोहम्मद संघटनेने म्हटले आहे.

कोण आहे मसूद अजहर? मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहर भारताच्या ताब्यात होता. मात्र १९९९ आयसी-८१४ या इंडियन एअरलाईन्सच्या हायजॅकनंतर बंधक नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले होते. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. त्यानंतर बहावलपूर हा जैशचा मुख्य अड्डा बनला होता. 

प्रत्येक युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली१९४७ (पहिले भारत-पाक युद्ध) : भारत व पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नावरून १९४७ साली पहिले युद्ध झाले. जम्मू-काश्मीर संस्थान कोणाच्या ताब्यात राहणार या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला. पाकच्या मदतीने काश्मीरवर हल्ला झाला. महाराज हरीसिंह यांनी जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण केल्यानंतर भारताने सैन्य पाठवले आणि पाकिस्तानविरोधात संपूर्ण युद्ध सुरू झाले. हे युद्ध पाकिस्तान हरला.  

१९६५ (दुसरे भारत-पाक युद्ध) : ५ ऑगस्ट १९६५ रोजी काश्मीरवरून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भडकले. पाकिस्तानने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ अंतर्गत हजारो सैनिकांना स्थानिक बंडखोरांच्या वेशात भारतात घुसवले. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. सीमाभागात जोरदार लढाई झाली. पाकचा पराभव झाला.  

१९७१ (बांगलादेश मुक्तिसंग्राम) : पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीमुळे आणि स्थानिकांच्या स्वातंत्र्याच्या मागणीमुळे १९७१ मध्ये युद्ध सुरू झाले. भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला. पाकिस्तानने शरणागती पत्करली. बांगलादेश स्वतंत्र झाला. १९९९ (कारगिल युद्ध) : मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या कारगिल भागातील उंच टेकड्यांवर पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी कब्जा केला. भारताने ‘ऑपरेशन विजय’ ही कारवाई करून तसेच शेकडो जवानांनी बलिदान देऊन हा भाग परत मिळविला.  

२०१६ (सर्जिकल स्ट्राइक) : १८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने नियंत्रणरेषा पार करून सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.२०१९ (एअर स्ट्राइक) : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला, ज्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानात घुसुन जैशच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला.

टॅग्स :masood azharमसूद अजहरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक