शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:43 IST

भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक पोस्ट करत ही माहिती दिली.

मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या घडामोडी पाहता, भारत सरकारने इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना इस्रायलमधून भूमार्गाने प्रवास करून सीमेपर्यंत आणले जाईल आणि त्यानंतर विमानाने भारतात पोहोचवले जाईल."

तात्काळ नोंदणी करा!इस्रायलमधून परत येण्यास इच्छुक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तेल अवीवमधील भारतीय दूतावासाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी https://www.indembassyisrael.gov.in/indian_national_reg या लिंकवर जाऊन लगेच नोंदणी करावी. तसेच, कोणत्याही मदतीसाठी, तेल अवीवमधील भारतीय दूतावासाच्या २४/७ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी देखील माहिती जारी करण्यात आली आहे.

दूरध्वनी क्रमांक: +972 54-7520711, +972 54-3278392ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in

सुरक्षा सर्वोच्च प्राधान्यभारत सरकार परदेशातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. "सरकार परिस्थितीवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावास तेथील भारतीय समुदायाच्या संपर्कात असून, सर्वतोपरी मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे," असे मंत्रालयाने सांगितले.

यापूर्वी, इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत पहिले विमान येरेव्हान, आर्मेनिया येथून ११० भारतीय नागरिकांना घेऊन गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत