शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:06 IST

इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने उचललेले हे मोठे आणि धाडसी पाऊल भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय मानला जात आहे. 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत, आज (शुक्रवार) किमान १,००० भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.

इराणने हवाई मार्ग खुला केल्यानंतर पहिली विमानाची खेप आज रात्री ११ वाजता नवी दिल्लीत उतरणार आहे. हे विद्यार्थी इराणच्या मशहद शहरातून इराणी विमानाने दिल्लीला येतील. दुसरी आणि तिसरी उड्डाणे शनिवारी नियोजित आहेत. यापैकी एक विमान सकाळी, तर दुसरे संध्याकाळी पोहोचेल. दरम्यान, इराणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, ज्या भारतीय नागरिकांना इराण सोडून जायचे आहे, त्यांच्यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष कॉरिडॉरची व्यवस्था!गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि बहुतेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवली आहेत. असे असूनही, भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी एक विशेष कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे. भारताने बुधवारी इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले होते.

काही भारतीय विद्यार्थी जखमीदिल्लीतील इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही भारतीय विद्यार्थी इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ते सर्व तेहरानमधील इराणी परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. यापूर्वी, एकूण ११० भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला गट बुधवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचला होता. यापैकी ९४ विद्यार्थी जम्मू-काश्मीरचे होते. हे सर्व विद्यार्थी उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि त्यांना आर्मेनिया आणि दोहामार्गे बाहेर काढण्यात आले.

इराण आणि आर्मेनिया सरकारचे आभारइराणमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार गेल्या अनेक दिवसांपासून इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात उत्तर इराणमधून ११० भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. भारत सरकारने या सुटकेच्या प्रक्रियेला सहकार्य केल्याबद्दल इराण आणि आर्मेनियाच्या सरकारांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIndiaभारतwarयुद्ध