"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:08 IST2025-12-27T10:48:11+5:302025-12-27T11:08:57+5:30

अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे, दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक घाबरले आहेत. छळापासून वाचण्यासाठी ते भारताकडे सीमा उघडण्याची विनंती करत आहेत. रंगपूर, ढाका आणि मैमनसिंगमधील हिंदूंनी त्यांची व्यथा व्यक्त केली आहे.

Open the border, save us Hindus trapped in Bangladesh plea to India | "सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी

"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान, संकटात सापडलेल्या बांगलादेशात अडकलेले हिंदू नागरिक दहशतवादापासून वाचण्यासाठी भारताला त्यांच्या सीमा उघडण्याची विनंती करत आहेत.

दरम्यान, निर्वासित बांगलादेश सनातन जागरण माचा नेते निहार हलदर यांच्या मदतीने, रंगपूर, चितगाव, ढाका आणि मैमनसिंग येथे राहणाऱ्या हिंदू नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. या लोकांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद साधला.

जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी

रंगपूर येथील एका ५२ वर्षीय रहिवासी म्हणाले की, त्यांच्या धर्मामुळे त्यांना सतत अपमान सहन करावा लागत आहे. रस्त्यावर चालताना त्यांना ऐकू येणारे टोमणे लवकरच मॉब लिंचिंगमध्ये बदलू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक हिंदू म्हणतात की, ते अडकले आहेत आणि त्यांना कुठेही जायचे नाही. त्यांना अपमान सहन करावा लागत आहे कारण त्यांना दीपू आणि अमृत यांच्यासारखेच मारले जाईळ याची भीती आहे.

ढाक्यातील आणखी एका हिंदू रहिवाशाने सांगितले की, दीपू दास यांच्या लिंचिंगमुळे भीती निर्माण झाली आहे, तर माजी राष्ट्रपती खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे बांगलादेशात परतणे त्यांना आणखी चिंतेत टाकते. जर बीएनपी सत्तेत आली तर आपल्याला आणखी छळाला सामोरे जावे लागू शकते. शेख हसीनांची अवामी लीग ही आमची एकमेव रक्षक होती.

सनातन जागरण माछाच्या एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बांगलादेशमध्ये एकूण हिंदू लोकसंख्या २५ लाख आहे. ही संख्या कमी लेखता येणार नाही. भारतातील हिंदू संघटना दिखाव्यासाठी बोलत आहेत, पण दुसरे काही नाही. आपण नरसंहाराकडे वाटचाल करत आहोत.

Web Title : बांग्लादेशी हिंदुओं की गुहार: सीमा खोलें, हमें हिंसा से बचाएं

Web Summary : बढ़ती हिंसा का सामना कर रहे बांग्लादेशी हिंदुओं ने भारत से शरण के लिए अपनी सीमाएं खोलने की अपील की है। हाल की हत्याओं के बाद उत्पीड़न और संभावित भीड़ हत्या के डर से, वे राजनीतिक बदलावों पर चिंता व्यक्त करते हैं और सुरक्षा चाहते हैं, अपनी भेद्यता और घटती आबादी पर प्रकाश डालते हैं।

Web Title : Bangladesh Hindus Plead: Open Border, Save Us From Violence

Web Summary : Facing rising violence, Bangladeshi Hindus appeal to India to open its borders for refuge. Fearing persecution and potential mob lynching after recent killings, they express concern over political shifts and seek protection, highlighting their vulnerability and dwindling population.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.