शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi in UN : "भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 20:01 IST

PM Narendra Modi at United Nations General Assembly : भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संयुक्त राष्ट्र महासभेला (United Nations General Assembly) संबोधित करत आहेत. कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसेच कोरोना संकटात भारतानं अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' अभियान राबवलं. भारतात आता डिजिटल युग सुरू झाल्याचं देखील सांगितलं. याच दरम्यान त्यांनी UNमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. "भारतीय स्वातंत्र्याचं यंदा 75 वं वर्ष आहे. या वर्षात आम्ही भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार" असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. 

भारत 'सेवा परमो धर्मा'अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. लसीची निर्यात देखील पुन्हा सुरू झाली आहे असं मोदींनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत केलं. अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ द्यायचा नसेल, तर आपण सजग राहायला हवं. जे दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांनादेखील दहशतवादाचा फटका बसू शकतो, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी, अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

जे दहशतवादाचा वापर करताहेत...; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा

अफगाणिस्तान, दहशतवाद, कोरोना संकट, लसीकरण, हवामान बदल अशा विविध मुद्द्यांवर मोदींनी संयुक्त राष्ट्राला संबोधित केलं. जगात सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. छुपी युद्धं सुरू आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती वाईट आहे. तिथल्या जनतेला, महिलांना, लहान मुलांना, अल्पसंख्याकांना मदतीची गरज आहे. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं मोदी म्हणाले.

जगासमोर कट्टरतावादाचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगतीशील विचार वाढायला हवेत. समुद्र हा आपल्याकडे असणारा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आपण समुद्रातील संसाधनांचा वापर करायला हवा, गैरवापर करू नये. आंतरराष्ट्रीय व्यापारात समुद्र आपल्यासाठी लाईफलाईन आहेत. त्यामुळे आपण समुद्रांना विस्तारवादाच्या स्पर्धेपासून दूर ठेवायला हवं, असं मत मोदींनी व्यक्त केलं. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत