शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

PM Modi in UN : "भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 20:01 IST

PM Narendra Modi at United Nations General Assembly : भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संयुक्त राष्ट्र महासभेला (United Nations General Assembly) संबोधित करत आहेत. कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसेच कोरोना संकटात भारतानं अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' अभियान राबवलं. भारतात आता डिजिटल युग सुरू झाल्याचं देखील सांगितलं. याच दरम्यान त्यांनी UNमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. "भारतीय स्वातंत्र्याचं यंदा 75 वं वर्ष आहे. या वर्षात आम्ही भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार" असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. 

भारत 'सेवा परमो धर्मा'अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. लसीची निर्यात देखील पुन्हा सुरू झाली आहे असं मोदींनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत केलं. अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ द्यायचा नसेल, तर आपण सजग राहायला हवं. जे दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांनादेखील दहशतवादाचा फटका बसू शकतो, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी, अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

जे दहशतवादाचा वापर करताहेत...; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा

अफगाणिस्तान, दहशतवाद, कोरोना संकट, लसीकरण, हवामान बदल अशा विविध मुद्द्यांवर मोदींनी संयुक्त राष्ट्राला संबोधित केलं. जगात सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. छुपी युद्धं सुरू आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती वाईट आहे. तिथल्या जनतेला, महिलांना, लहान मुलांना, अल्पसंख्याकांना मदतीची गरज आहे. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं मोदी म्हणाले.

जगासमोर कट्टरतावादाचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगतीशील विचार वाढायला हवेत. समुद्र हा आपल्याकडे असणारा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आपण समुद्रातील संसाधनांचा वापर करायला हवा, गैरवापर करू नये. आंतरराष्ट्रीय व्यापारात समुद्र आपल्यासाठी लाईफलाईन आहेत. त्यामुळे आपण समुद्रांना विस्तारवादाच्या स्पर्धेपासून दूर ठेवायला हवं, असं मत मोदींनी व्यक्त केलं. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत