शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:48 IST

Kabul Water Shortage Crisis: हवामान बदलामुळे पाण्याची कमतरता आणखी वाढली आहे. अलिकडच्या वर्षांत देशभरात पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुल लवकरच मोठ्या दुष्काळी परिस्थीतीला तोंड देणार आहे. पुढील पाच वर्षांत पाण्याची टंचाई असलेले पहिले या आधुनिक जगातील शहर बनू शकते. सुमारे सहा दशलक्ष लोकसंख्या असलेले हे शहर येत्या पाच वर्षांचा पाण्यासाठी वणवण करत फिरताना दिसणार आहे. 

मर्सी कॉर्प्सने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, अतिरेकी उपसा आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे अफगाणिस्तानच्या राजधानीतील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. गेल्या दशकात काबुलच्या जलसाठ्याची पातळी २५-३० मीटर (८२-९८ फूट) खाली गेली आहे, दरवर्षी नैसर्गिक पुनर्भरणापेक्षा ४४ दशलक्ष घनमीटर (१,५५३ घनफूट) जास्त पाणी उपसा होत आहे, असे या वर्षी एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जर हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत काबुलमधील जलसाठे कोरडेठाक पडणार आहेत. यामुळे अफगाणिस्तानची राजधानीच अस्तित्वात राहणार नाही. सुमारे तीस लाख अफगाणी विस्थापित होऊ शकतील, असे या अहवालात म्हटले आहे. रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे अर्धे भूमिगत बोअरवेल कोरडे पडलेले आहेत. 

जल प्रदूषण देखील याला कारणीभूत असणार आहे. सांडपाणी, आर्सेनिक आणि क्षारतेचे प्रमाण जास्त अती प्रमाणावर असल्याने तेथील ८० टक्के भूजल असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. दुसरे एक कारण म्हणजे वाढलेली लोकसंख्या. २००१ मध्ये तेथील लोकसंख्या ही १० लाखांहूनही कमी होती ती आता ६० लाख झाली आहे. याचाही परिणाम जलसाठ्यावर होत आहे. 

हवामान बदलामुळे पाण्याची कमतरता आणखी वाढली आहे. अलिकडच्या वर्षांत देशभरात पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे. “काबूल नदी, पघमान नदी आणि लोगार नदी या तीन नद्या ज्या काबूलचे भूजल पुन्हा भरतात त्या हिंदूकुश पर्वतांमधून येणारे बर्फ आणि हिमनदी वितळणाऱ्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत,” असे मर्सी कॉर्प्सच्या अहवालात नमूद केले आहे. ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत हिवाळ्याच्या हंगामात सरासरीच्या फक्त ४५ ते ६० टक्के पाऊस पडला. याचाही फटका जलसाठे भरण्यास बसला असल्याचे यात म्हटले आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई