Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 22:05 IST2025-08-11T21:04:25+5:302025-08-11T22:05:01+5:30

Indian Embassy in Pakistan : इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांच्या निवासस्थानांमध्ये आणि कार्यालयांमध्ये अनधिकृत प्रवेशाच्या घटना घडल्या आहेत.

Indian Embassy in Pakistan Pakistan panics after 'Operation Sindoor'! Water and gas supply to Indian ambassador in Islamabad stopped, newspapers banned | Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. दरम्यान, आता पाकिस्तानने भारतीय राजदूतांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. 

पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि भारतीय राजदूतांच्या निवासस्थानांना वर्तमानपत्रांचे वितरण थांबवले आहे. प्रत्युत्तरादाखल, भारताने नवी दिल्लीत तैनात असलेल्या पाकिस्तानी राजदूतांना वर्तमानपत्रांचा पुरवठा थांबवला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून भारतीय राजदूतांवरही लक्ष ठेवले जात आहे.

PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात

इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांच्या निवासस्थानांमध्ये आणि कार्यालयांमध्ये अनधिकृत प्रवेशाच्या घटना घडल्या आहेत. या घटना राजदूत आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची आणि सन्मानाची हमी देणाऱ्या राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कराराचे स्पष्ट उल्लंघन आहेत. या कृतींकडे राजनैतिक कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

या गोष्टी पुरवू नयेत असे निर्देश 

इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना गॅस आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा मिळविण्यातही अडचणी येत आहेत. कारण स्थानिक दुकानदारांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना या गोष्टी पुरवू नयेत असे निर्देश दिले आहेत. ऑपरेशन सिंदूरपूर्वी तेच विक्रेते भारतीय उच्चायुक्तालयाला गॅस सिलिंडर आणि पॅकेज्ड पिण्याचे पाणी पुरवत होते, परंतु आता ते तसे करण्यास कचरतात आणि बहुतेक वेळा नकार देतात.

२०१९ मध्येही असाच त्रास होता

२०१९ च्या सुरुवातीला, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, पाकिस्तानी अधिकारी भारतीय राजनैतिक कर्मचाऱ्यांवर सतत दबाव आणत असताना इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हा असे यापूर्वीही घडले आहे. त्यावेळीही भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे त्रास देण्यात आला होता.'

Web Title: Indian Embassy in Pakistan Pakistan panics after 'Operation Sindoor'! Water and gas supply to Indian ambassador in Islamabad stopped, newspapers banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.