India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:54 IST2025-05-09T14:50:12+5:302025-05-09T14:54:05+5:30
India Pakistan War : गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. आता याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेत उमटले आहेत.

India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. याला भारतीय लष्करानेही प्रत्युत्तर दिले. भारत दररोज पाकिस्तानच्या शहरांनाही लक्ष्य करत आहे, तर पाकिस्तानचे आकाशातील हल्ले अयशस्वी होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तान संसदेत युद्धाच्या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा एका खासदाराने त्यांच्या सरकारला सुनावले.
इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे खासदार शाहिद अहमद यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर टीका केली. शाहबाज शरीफ यांचे सरकार भित्रे आहे. ते इतके कमकुवत लोक आहेत की ते नरेंद्र मोदींचे नाव घेण्यासही घाबरतात.
In an outburst, a Pakistani MP slammed Prime Minister Shehbaz Sharif as 'Buzdil' (coward), accusing him of lacking the courage to even utter Prime Minister @narendramodi's name. The MP laments that Pakistan’s army is demoralized and the nation stands helpless, unable or unwilling… pic.twitter.com/s6EjlDDlj3
— DD News (@DDNewslive) May 9, 2025
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
खासदार शाहिद अहमद याने टिपू सुलतानच्या एका विधानाचा हवाला देत शाहबाज शरीफ यांची तुलना थेट कोल्ह्याशी केली. शाहिद अहमद म्हणाले, 'जर लष्कराचा नेता सिंह असेल आणि त्याच्या सैन्यात कोल्हे असतील, तरीही ते सिंहासारखे लढतात.' पण जर नेतृत्व कोल्ह्याच्या हातात असेल तर सिंहही त्यांची शक्ती गमावतात. जेव्हा तुमचे नेते आणि पंतप्रधान भित्रे असतील, तर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? आपल्याकडे असा नेता आहे जो नरेंद्र मोदींचे नावही घेत नाही, अशी टीका त्या खासदाराने केली.
"शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदींचे नावही घेतले नाही. त्याचे व्यावसायिक संबंध आहेत. ते त्याचे नावही घेऊ शकत नाहीत. नवाझ शरीफ यांनी भारताबद्दल एकही विधान केले नाही, असा आरोप त्या खासदाराने केला.
'इम्रान खान यांना स्वार्थासाठी तुरुंगात टाकले'
इम्रान खान यांच्या खासदाराने सांगितले की, सीमेवरील परिस्थिती पाहता आपल्याला धैर्याने लढावे लागेल. मला असे म्हणायचे आहे की ते कोण लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इम्रान खान सारख्या नेत्याला कोंडून ठेवले आहे? माझ्या किंवा तुमच्या भाषणांमुळे समुदाय तुमच्यासोबत येणार नाही. काल आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला गेलो तेव्हा आम्हाला त्यासाठीही परवानगी देण्यात आली नाही. आम्हाला आशा होती की ते समाजासाठी काहीतरी बोलतील, जे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू, असंही ते म्हणाले.