शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहिर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 00:59 IST

India-Pakistan Tension : बलोचस्तान लिबरेशन आर्मीने कराची बंदर अन् क्वेटामध्ये पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत.

India-Pakistan Tension : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. आज अचानक पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. अशातच आता पाकिस्तानची अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी जाली आहे. 

बलोच आर्मीचे पाक सैन्यावर हल्लेपाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला केला आहे. तसेच, सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली एक गॅस पाइपलाइन देखील उडवून दिली आहे. एकीकडे भारतीय सैन्य पाकिस्तावर हल्ले करत आहे, तर दुसरीकडे बलोच आर्मीकडून पाकला दणक्यावर दणके बसत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.

भारताच्या हल्ल्यात पाकची संरक्ष प्रणाली नष्टऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची दाणादाण झाली आहे. भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच बलुचिस्तानमधील बीएलएने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी राजवटीची अंतर्गत कमकुवततादेखील जगासमोर आली आहे. 

पाकिस्तानचे दोन तुकडे होणार?बीएलएचा हा हल्ला म्हणजे बलुचिस्तानची बंडखोरी आता निर्णायक वळणावर पोहोचत असल्याचे लक्षण आहे. पाकिस्तान बऱ्याच काळापासून  बलुचिस्तानच्या नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, हा हल्ला दर्शवितो की पाकिस्तानी सैन्य आता दोन आघाड्यांवर अडकले आहे. 

विश्लेषकांचे मत आहे की जर पाकिस्तानने बलुचिस्तानमधील परिस्थिती गांभीर्याने घेतली नाही, तर हे हल्ले मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. ऑपरेशन सिंदूरनंतर, तेथील फुटीरतावादी संघटना पाकिस्तानच्या लष्करी अपयशाचा फायदा घेऊन पाकिस्तानचे दोन तुकडे करू शकतात. पुढे काय होईल, हे लवकरच कळेल.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान