शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

India Pakistan Conflict :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ; जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:06 IST

India Pakistan Conflict : आधीच आर्थिक परिस्थिती वाईट असणाऱ्या पाकिस्तानने भारतासोबत पंगा घेऊन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

India Pakistan Conflict ( Marathi News ) : पहलमाग दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. काल पाकिस्तानने अचानक हल्ले वाढवले, या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच वाईट आहे, पाकिस्तान आता जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून कर्जासाठी आवाहन करत आहे. 

पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सल्लागार विभागाने 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून अधिक कर्जाची मागणी केली आहे.

कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला

वाढत्या युद्ध आणि घसरत्या शेअर बाजाराच्या पार्श्वभूमीवर, आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करण्याचे आवाहन करतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. या पोस्टमध्ये राष्ट्राला खंबीर राहण्याचे आवाहन करण्यात आले. पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बैठक आहे.

आयएमएफ व्यवस्थापनाचा भाग असल्याने भारत देखील या बैठकीत भाग घेईल आणि येथेही पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्याची कोणतीही संधी सोडणार नाही.

भारत विरोध करणार

दरम्यान, भारताच्या विरोधाला न जुमानता, पाकिस्तानला पॅकेज देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. कारण आयएमएफचे दोन सर्वात मोठे भागधारक अमेरिका आणि चीन यांच्याकडून कोणताही विरोध होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला आर्थिक पॅकेज देणे म्हणजे जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणे असे भारत सदस्य देशांना बैठकीत दाखवून देईल.

 भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला

पाकिस्तानने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या सीमाभागातील शहरांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत ड्रोन, मिसाईल हल्ले हाणून पाडले. त्यातच भारतीय नौदलानेही पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला आहे. भारतीय युद्धनौका INS विक्रांतने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्याची कराची बंदरात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

१९७१ च्या युद्धानंतर भारतीय नौदलाकडून पहिल्यांदाच कराचीसारख्या प्रमुख शहरावर हल्ला करण्यात आला आहे. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. सैन्य सूत्रांनुसार, INS विक्रांत आणि अन्य युद्धनौकांनी रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या नौदल तळ, इंधन डेपो आणि इतर प्रमुख सैन्य छावण्यांना टार्गेट केले. या हल्ल्यात अचूक टिपणाऱ्या मिसाईलसोबत समुद्रात लांबून डागणाऱ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWorld Bankवर्ल्ड बँक