शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

India Pakistan Conflict :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ; जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:06 IST

India Pakistan Conflict : आधीच आर्थिक परिस्थिती वाईट असणाऱ्या पाकिस्तानने भारतासोबत पंगा घेऊन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

India Pakistan Conflict ( Marathi News ) : पहलमाग दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. काल पाकिस्तानने अचानक हल्ले वाढवले, या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच वाईट आहे, पाकिस्तान आता जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून कर्जासाठी आवाहन करत आहे. 

पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सल्लागार विभागाने 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून अधिक कर्जाची मागणी केली आहे.

कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला

वाढत्या युद्ध आणि घसरत्या शेअर बाजाराच्या पार्श्वभूमीवर, आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करण्याचे आवाहन करतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. या पोस्टमध्ये राष्ट्राला खंबीर राहण्याचे आवाहन करण्यात आले. पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बैठक आहे.

आयएमएफ व्यवस्थापनाचा भाग असल्याने भारत देखील या बैठकीत भाग घेईल आणि येथेही पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्याची कोणतीही संधी सोडणार नाही.

भारत विरोध करणार

दरम्यान, भारताच्या विरोधाला न जुमानता, पाकिस्तानला पॅकेज देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. कारण आयएमएफचे दोन सर्वात मोठे भागधारक अमेरिका आणि चीन यांच्याकडून कोणताही विरोध होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला आर्थिक पॅकेज देणे म्हणजे जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणे असे भारत सदस्य देशांना बैठकीत दाखवून देईल.

 भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला

पाकिस्तानने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या सीमाभागातील शहरांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत ड्रोन, मिसाईल हल्ले हाणून पाडले. त्यातच भारतीय नौदलानेही पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला आहे. भारतीय युद्धनौका INS विक्रांतने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्याची कराची बंदरात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

१९७१ च्या युद्धानंतर भारतीय नौदलाकडून पहिल्यांदाच कराचीसारख्या प्रमुख शहरावर हल्ला करण्यात आला आहे. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. सैन्य सूत्रांनुसार, INS विक्रांत आणि अन्य युद्धनौकांनी रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या नौदल तळ, इंधन डेपो आणि इतर प्रमुख सैन्य छावण्यांना टार्गेट केले. या हल्ल्यात अचूक टिपणाऱ्या मिसाईलसोबत समुद्रात लांबून डागणाऱ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWorld Bankवर्ल्ड बँक