भारत-बांगलादेश दरम्यान बससेवा पुन्हा सुरु झाली; १८ महिन्यांपूर्वी केलेली बंद, नव्या सरकारने भारतद्वेषी निर्णय बदलला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:46 IST2026-02-25T15:45:15+5:302026-02-25T15:46:58+5:30

India-Bangladesh Bus Service resumes: बांगलादेशात BNP सरकार सत्तेत आल्यानंतर १८ महिन्यांपासून बंद असलेली भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे कोलकाता आणि आगरतळा दरम्यानचा प्रवास सुकर होणार आहे.

India-Bangladesh Bus Service resumes: Bus service between India and Bangladesh resumed; There was a break of 18 months, the new government changed the anti-India decision | भारत-बांगलादेश दरम्यान बससेवा पुन्हा सुरु झाली; १८ महिन्यांपूर्वी केलेली बंद, नव्या सरकारने भारतद्वेषी निर्णय बदलला 

भारत-बांगलादेश दरम्यान बससेवा पुन्हा सुरु झाली; १८ महिन्यांपूर्वी केलेली बंद, नव्या सरकारने भारतद्वेषी निर्णय बदलला 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील बिघडलेले संबंध आता पुन्हा रुळावर येताना दिसत आहेत. बांगलादेशात राजकीय सत्तापालट होऊन 'बांगलादेश नॅशनल पार्टी' सत्तेत आल्यानंतर, गेल्या १८ महिन्यांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय 'मैत्री बस' सेवा अखेर मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा सुरू झाली. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना, विशेषतः ईशान्य भारतातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे ही बस सेवा खंडित करण्यात आली होती. १८ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोलकाता-ढाका-आगरतळा आणि आगरतळा-ढाका-कोलकाता या मार्गांवर बस पुन्हा धावू लागली आहे. ही सेवा सुरू होणे हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

महत्त्वाचा मार्ग: आगरतळाहून कोलकात्याला जाण्यासाठी हा मार्ग चिकन नेक पेक्षा खूपच कमी वेळेत पोहोचवतो.

नव्या सरकारचा पुढाकार: बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकार सत्तेत आल्यानंतर भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला जात आहे.

व्हिसा प्रक्रियेत सुलभता: बस सेवेसोबतच व्हिसा केंद्रांवरील कामकाजही पूर्ववत होत असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील 'लोकांशी लोकांचा संपर्क' अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title : भारत-बांग्लादेश बस सेवा 18 महीने बाद फिर शुरू; संबंध सुधरे

Web Summary : भारत-बांग्लादेश 'मैत्री बस' सेवा 18 महीने बाद फिर शुरू हुई, संबंध सुधरे। कोलकाता-ढाका-अगरतला मार्ग फिर से शुरू, व्यापार और सांस्कृतिक आदान-प्रदान को बढ़ावा। त्रिपुरा के मुख्यमंत्री ने कदम का स्वागत किया, लोगों के बीच मजबूत संबंध की उम्मीद।

Web Title : India-Bangladesh Bus Service Resumes After 18 Months; Ties Improving

Web Summary : India-Bangladesh 'Maitri Bus' service restarts after 18 months due to improved relations. The Kolkata-Dhaka-Agartala route is now operational, boosting trade and cultural exchange. Tripura CM welcomes the move, anticipating stronger people-to-people connections.